Homeमहाराष्ट्रश्वान निर्बीजीकरणाचे टेंडर पडून, चारदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना:अकोटमध्ये भटक्या श्वानांची संख्या...

श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर पडून, चारदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना:अकोटमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त‎

शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोट नगरपरिषदेकडून काढण्यात आलेले श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर प्रतिसादाअभावी पडून राहिले आहे. संबंधित कामासाठी एकाही कंत्राटदाराने किंवा संस्थेने निविदा दाखल न केल्याने निर्बीजीकरणाची मोहीम रखडली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांकडून श्वानांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा, यासाठी नव्याने निविदा काढण्याबाबत तसेच पर्यायी उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गांभीर्याने हाताळून निर्बीजीकरणाची मोहीम लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. निर्बिजीकरणाकरिता अकोट नगरपरिषदेकडून चार वेळा निविदा करूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नसल्याने भटक्या कुत्र्यांना आवर घालणे कठीण झाले आहे. शहरातील विविध भागात दररोज कुत्रा चावल्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निर्बीजीकरणाचा ठेका रखडल्याने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नांना विलंब होणार असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर ^खानापूर परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. – प्रवीण तेलगोटे, नागरिक. बंदोबस्तासाठी पर्यायी व्यवस्था करणार ^निर्बिजीकरणाकरिता चार वेळा निविदा काढूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नाही. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तात्पुरती पर्यायी व्यवस्था करणार आहोत. – शशिकांत बाबर, मुख्याधिकारी, नगरपरिषद. उपाययोजना करणार ^श्वानांच्या नियंत्रणासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढलेल्या निविदेला आजवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा देण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणार . – माया धुळे, नगराध्यक्षा



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला...

0
कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये...

13 जूनचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची...

0
शनिवार, 13 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी पेमेंट गोळा करण्यासाठी चांगला दिवस आहे आणि आयात-निर्यात व्यवसायात नवीन फायदेशीर संपर्क निर्माण होऊ शकतात. सिंह...

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांच्या सहकार्याची आवश्यकता:नगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यशाळेचे उद्घाटन‎

0
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रेडिट प्लान कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सल्लागार शैलेश पाटील आणि विभागीय उपजीविका सल्लागार नवनाथ नाईक यांच्या...
spot_img

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

वैभव सूर्यवंशीच्या धाकट्या भावाने शतक केले:10 वर्षांच्या आशीर्वादने 21 चौकार मारले; वडील म्हणाले होते-...

0
वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी देखील क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. 10 वर्षांच्या आशीर्वादने समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका स्थानिक सराव सामन्यात...

नव्या पिढीत वाढत आहे डिजिटल थकवा:आता ऑफ ग्रिड प्रवास; 47% पालक, 30% मुले साधे...

0
एक काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये डिजिटल साधने आणि सोशल मीडिया स्वीकारण्याची स्पर्धा लागली होती. पण आता चित्र बदलत आहे....

मूव्ही रिव्ह्यू- गव्हर्नर:देश दिवाळखोर होण्यापासून वाचवण्याची कथा, मनोज वाजपेयींनी कठीण विषयही रंजक बनवला

0
आजचा भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो, पण एक काळ असाही होता, जेव्हा देशाला आवश्यक वस्तू आयात करण्यासाठीही पैसे उरले नव्हते. परकीय चलन...
error: Content is protected !!