Homeपुणे / पिंपरी-चिंचवडस्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद ; हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम

हर घर योद्धा स्वसंरक्षण शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; २४४ जणांचा सहभाग, १४४ जणांना प्रशस्तीपत्रके

पुणे — युवक आणि युवतींनी स्वसंरक्षणाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय ‘हर घर योद्धा’ स्वसंरक्षण शिबिरांना पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९ एप्रिलपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत नायगाव, पेठ, लोणी काळभोर, कोलवडी, थेऊर, पांडवदंड, दहिटणे, शिरवळ, भोर, तळेगाव दाभाडे आणि राजगुरूनगर येथे शिबिरे पार पडली.

या शिबिरांमध्ये एकूण २४४ युवक  व युवतींनी सहभाग घेतला. त्यापैकी १४४ जणांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली. स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांसह मानसिक सक्षमीकरण, प्रसंगावधान आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याचे प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले.

प्रशिक्षण घेतलेल्या सहभागींकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. कु. श्रावणी माळवे यांनी, “या शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला असून कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची तयारी झाली”, असे सांगितले. तर नायगाव येथील सौ. सुप्रिया चौधरी यांनी, “अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची मानसिकता आणि मनाने अधिक कणखर होण्याची प्रेरणा या शिबिरातून मिळाली”, असे मत व्यक्त केले.

शिबिरांच्या यशस्वितेमागे स्थानिक स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचेही मोठे योगदान राहिले. कोलवडी येथील युवकांनी शिबिराचा प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. थेऊर येथे ग्रामस्थांनी घरोघरी जाऊन जनजागृती करत शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला. शिरवळ येथे मे महिन्याच्या कडक उन्हात दुपारच्या वेळेत शिबिर होत असूनही युवतींचा उत्साह कायम राहिला. स्थानिक शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही शिबिरासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिलेला स्वतःचे संरक्षण करता यावे, आत्मविश्वासाने जगता यावे आणि संकटांचा धैर्याने सामना करता यावा, यासाठी अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

दरम्यान, ‘हर घर योद्धा’ अभियानाचा विस्तार करण्यात येत असून लवकरच कोथरूड, कात्रज आणि पुणे शहरातील विविध भागांमध्ये नवीन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. इच्छुक युवक  व युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ८९८३३३५५१७

        

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख:जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील; 2 महिन्यांपूर्वी बनले...

0
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे नवे प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती केली आहे. सेठ सध्या उपसेनाप्रमुख (व्हाईस...

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला...

0
कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये...

13 जूनचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची...

0
शनिवार, 13 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी पेमेंट गोळा करण्यासाठी चांगला दिवस आहे आणि आयात-निर्यात व्यवसायात नवीन फायदेशीर संपर्क निर्माण होऊ शकतात. सिंह...

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...
spot_img

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

वैभव सूर्यवंशीच्या धाकट्या भावाने शतक केले:10 वर्षांच्या आशीर्वादने 21 चौकार मारले; वडील म्हणाले होते-...

0
वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी देखील क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. 10 वर्षांच्या आशीर्वादने समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका स्थानिक सराव सामन्यात...

नव्या पिढीत वाढत आहे डिजिटल थकवा:आता ऑफ ग्रिड प्रवास; 47% पालक, 30% मुले साधे...

0
एक काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये डिजिटल साधने आणि सोशल मीडिया स्वीकारण्याची स्पर्धा लागली होती. पण आता चित्र बदलत आहे....

मूव्ही रिव्ह्यू- गव्हर्नर:देश दिवाळखोर होण्यापासून वाचवण्याची कथा, मनोज वाजपेयींनी कठीण विषयही रंजक बनवला

0
आजचा भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो, पण एक काळ असाही होता, जेव्हा देशाला आवश्यक वस्तू आयात करण्यासाठीही पैसे उरले नव्हते. परकीय चलन...
error: Content is protected !!