छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या कौशिकी गल्ली येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर वेरूळ गावात बुधवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 3 वाजल्यापासून संतप्त गावकऱ्यांनी भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मृत सुरेश बोरसे यांच्या पत्नी अनिता बोरसे यांनी खुलताबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 10 जून 2026 रोजी रात्री 12 वाजता औषध आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या सुरेश बोरसे यांना काही अनोळखी व्यक्तींनी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून जबरदस्तीने नेले. स्वतःला पोलिस असल्याचे सांगणाऱ्या त्या व्यक्तींनी कुटुंबीयांना सरकारी कामात अडथळा आणल्यास कारवाईची धमकी दिली. नंतर सुरेश बोरसे यांना गंभीर अवस्थेत छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी 3 पासून रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत बुधवारी दुपारी तीन वाजता मृतदेह गावात येताच संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी भोसले चौकात रास्ता रोको सुरू केला. शेकडो महिला-पुरुष रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने भोसले चौक ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भोसले चौकापासून कन्नड रस्त्याकडे वाहतूक वळवली. पर्यायी मार्गावरही प्रचंड गर्दी झाल्याने ‘विश्वकर्मा मंत्रिमंडळ’ परिसरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ‘आम्हाला फक्त न्याय हवा’ : कुटुंबाची भूमिका बोरसे कुटुंबीयांनी “आम्हाला फक्त न्याय हवा, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे” या मागणीवर ठाम राहत रास्ता रोको सुरूच ठेवला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संध्याकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी दंगा निवारक पथक व अतिरिक्त कुमक वेरूळ येथे तैनात केली. गुन्हा दाखल, शोककळा पसरली उपविभागीय पोलिस अधिकारी, स्थानिक पोलिस व काही राजकीय नेत्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करून समजूत काढली. रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांच्या एकमताने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. खुलताबाद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106(1) व 131 अन्वये गुन्हा दाखल केला असून निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. शिक्षकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण वेरूळ गावावर शोककळा पसरली आहे. गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची गाडी सज्ज ठेवण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. तपासाला गती देण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अंबादास दानवेच्या आक्रमक भूमिकेमुळे 22 तासानंतर गुन्हा दाखल शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू झाला असून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे नागरिकांनी चक्का जाम केला होता. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत चक्काजाम मध्ये सहभाग घेत न्यायासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वेरूळ परिसरात एका आरोपीच्या शोधासाठी दोन पोलिस कर्मचारी आणि फिर्यादी घटनास्थळी गेले होते. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून हे पथक आले होते. यावेळी रस्त्याने जाणारे शिक्षक सुरेश बोरसे यांनी “काय झाले?” अशी साधी विचारणा केली. मात्र याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी यांनी शिक्षकाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप होत असून त्यानंतर झालेल्या हल्ल्यात सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षण करणारेच जर कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
Source link
वेरूळ येथे शिक्षकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर गावात तणाव:दुपारी 3 पासून रास्ता रोको, अंबादास दानवेंच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























