Homeमहाराष्ट्रघाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आदित्य सोळंके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. घाटीच्या रक्तपेढीने मूल्यांकन कालावधीत १५,०३२ रक्तपिशव्यांचे संकलन केले. तसेच, गरजू रुग्णांना २३,४४७ रक्त व रक्तघटकांचे सुरक्षित वितरण केले. रक्तपेढीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने २२४ स्वेच्छा रक्तदान शिबिरे यशस्वीपणे आयोजित करून जनजागृती केली. विशेषतः, अत्यंत दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या तीन रुग्णांना आणि अनेक ‘आरएच निगेटिव्ह’ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यात आले. ऑटोइम्यून हिमोलिटिक ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या तीन थॅलेसेमिया रुग्णांना ‘सबग्रुप मॅच’ केलेले विशेष रक्त पुरवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यापूर्वीही रक्तपेढीला स्थानिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते रक्तपेढीला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले होते. २६ जानेवारी २०२६ रोजी जीएमसीएच प्रशासनानेही या टीमचा सत्कार केला होता, तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने (MSACS) देखील या रक्तपेढीचा गौरव केला आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे आणि पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भरत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रक्तसंक्रमण अधिक अचूक करणारी जेल कार्ड प्रणाली, थॅलेसेमिया बालकांसाठी स्टेराइल कनेक्टिंग डिव्हाइस आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी एनएएटी (NAAT) तपासणीची पूर्वतयारी समाविष्ट आहे. डॉ. वैशाली नागोसे (प्रभारी, २०२४-२५) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विनी तांगडे, डॉ. विजया वाणे, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. प्रमोद सरवडे, प्रयोगशाळा कर्मचारी, परिचारिका आणि समुपदेशक यांनी या यशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कोईम्बतूर NEET आत्महत्या | अनुकीर्तना विद्यार्थी भय परीक्षा

0
मराठी बातम्याराष्ट्रीयकोईम्बतूर NEET आत्महत्या | अनुकीर्तना विद्यार्थी भय परीक्षा | मंत्री राजीनाम्याची मागणीकोयंबतूर24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये NEET ची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय...

chaturthi vrat significance, Ganesh vishnu puja vidhi, Jupiter planet worship, shivalinga puja, offer chandan...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मChaturthi Vrat Significance, Ganesh Vishnu Puja Vidhi, Jupiter Planet Worship, Shivalinga Puja, Offer Chandan And Yellow Flowers For Lord Shiva49 मिनिटांपूर्वीलिंक...

ऑस्ट्रेलियाई स्पिनर्सनी पहिल्यांदाच टी-20 मध्ये 9 बळी घेतले:कंगारूंनी बांगलादेशला 4 गडी राखून हरवले; कॉनोलीने...

0
ऑस्ट्रेलियाई फिरकीपटूंनी टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 9 बळी घेतले आहेत. यामुळे मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 4 गडी राखून पराभव केला....

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:प्रकृती खालावल्याने राज्यभरात संताप, महामार्गावर टायर जाळले

0
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग...
spot_img

ऑस्ट्रेलियाई स्पिनर्सनी पहिल्यांदाच टी-20 मध्ये 9 बळी घेतले:कंगारूंनी बांगलादेशला 4 गडी राखून हरवले; कॉनोलीने...

0
ऑस्ट्रेलियाई फिरकीपटूंनी टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच 9 बळी घेतले आहेत. यामुळे मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा 4 गडी राखून पराभव केला....

वैभव सूर्यवंशीवर दंड आकारला जाईल:सामना शुल्कातून 50% कपात करण्याची शिफारस, तिलक-डिकवेला आणि हलामबागे यांचाही...

0
भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर झालेल्या वादामुळे वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ए च्या विशेन हलामबागेवर सामना शुल्काच्या 50% दंड...

आंबा खाण्याची उत्तम वेळ; खाण्याचा योग्य मार्ग

0
7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआंबा फळांचा राजा आहे. त्याच्या अनोख्या चवीमुळे आणि पोषणामुळे तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. पण तो खाण्याबद्दल लोकांच्या मनात...

रामचरणचा चित्रपट RC17 सुकुमार घाईघाईने बनवणार नाहीत:’पेड्डी’ च्या यशानंतर पटकथा सुधारत आहेत दिग्दर्शक

0
सुपरस्टार राम चरण सध्या 'पेड्डी' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. 4 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर 300 कोटींहून अधिक...
error: Content is protected !!