Homeमहाराष्ट्रघाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

घाटी रक्तपेढीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव:अहमदाबाद येथील परिषदेत उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) अंतर्गत असलेल्या प्रादेशिक रक्तपेढीने राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. अहमदाबाद येथे १६ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवी संस्था परिषदेत देशभरातील शासकीय रक्तपेढ्यांमध्ये या रक्तपेढीला गौरवण्यात आले. वर्ष २०२५ मधील उत्कृष्ट कार्यक्षमता, दर्जेदार सेवा आणि स्वेच्छा रक्तदान चळवळीचा प्रभावी प्रसार या योगदानासाठी हा सन्मान प्रदान करण्यात आला. रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आदित्य सोळंके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. घाटीच्या रक्तपेढीने मूल्यांकन कालावधीत १५,०३२ रक्तपिशव्यांचे संकलन केले. तसेच, गरजू रुग्णांना २३,४४७ रक्त व रक्तघटकांचे सुरक्षित वितरण केले. रक्तपेढीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या सहकार्याने २२४ स्वेच्छा रक्तदान शिबिरे यशस्वीपणे आयोजित करून जनजागृती केली. विशेषतः, अत्यंत दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च्या तीन रुग्णांना आणि अनेक ‘आरएच निगेटिव्ह’ रुग्णांना तातडीने रक्त उपलब्ध करून देण्यात आले. ऑटोइम्यून हिमोलिटिक ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या तीन थॅलेसेमिया रुग्णांना ‘सबग्रुप मॅच’ केलेले विशेष रक्त पुरवून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. यापूर्वीही रक्तपेढीला स्थानिक पातळीवर सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते रक्तपेढीला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले होते. २६ जानेवारी २०२६ रोजी जीएमसीएच प्रशासनानेही या टीमचा सत्कार केला होता, तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने (MSACS) देखील या रक्तपेढीचा गौरव केला आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे आणि पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. भरत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यामध्ये रक्तसंक्रमण अधिक अचूक करणारी जेल कार्ड प्रणाली, थॅलेसेमिया बालकांसाठी स्टेराइल कनेक्टिंग डिव्हाइस आणि सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी एनएएटी (NAAT) तपासणीची पूर्वतयारी समाविष्ट आहे. डॉ. वैशाली नागोसे (प्रभारी, २०२४-२५) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विनी तांगडे, डॉ. विजया वाणे, डॉ. अंजली कुलकर्णी, डॉ. प्रमोद सरवडे, प्रयोगशाळा कर्मचारी, परिचारिका आणि समुपदेशक यांनी या यशासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!