Homeदेश-विदेशदहशतवादी हल्ल्यानंतर पळगम दहशतवादी हल्ला बिलावल भुट्टो आणि पाकिस्तान पंत

दहशतवादी हल्ल्यानंतर पळगम दहशतवादी हल्ला बिलावल भुट्टो आणि पाकिस्तान पंत


पहलगम दहशतवादी हल्ल्यावरील पाकिस्तान: जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेक निष्पापांचा बळी घेतला आणि जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त भारतच नव्हे, तर इतरही अनेक मित्र राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविषयीसुद्धा नाराजीचा सूर आळवला. इथं भारताकडून दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या प्रोत्साहानाचा निषेध करत अनेक करार आणि सीमाभागातून होणारे व्यवहार रद्द करण्यात आले. ज्यामुळं पाकिस्ताननंही भारताविरोधात जाहीर भूमिका घेतली.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात तणाव कमी होत नसतानाच शेजारी राष्ट्राच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली.

एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर…

एका जाहीर सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भुट्टो यांनी सिंधू जल कारारासंदर्भात भाष्य करत भारताला थेट इशारा दिला. ‘मी सिंधू नदीच्या काठावर उभा राहून भारताला स्पष्टपणे सांगतोय की, सिंधू (नदी) आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर मग इथं आमच्याच रक्ताचे पाट वाहतील…’, असं भुट्टो म्हणाले.

बिलावल भुट्टो जरदारी यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीसुद्धा सिंधू जल कारारासंदर्भातील तणावपूर्ण वातावरणात आपल्या जळजळीत वक्तव्यानं आणखी भर टाकली. ‘पाकिस्तानला पुरवलं जाणारं पाणी कमी केलं किंवा वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी याचं उत्तर पूर्ण ताकदीनं दिलं जाईल, कोणीही इथं काहीही चूक करुच नये’ असं म्हणत शांतता आमची प्राथमिकता असली तरीही अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड करणार नसल्याची भूमिका मांडत त्यांनीसुद्धा भारताविरोधात सूर आळवला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले-...

0
जयपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे लोक धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्यांची विचारसरणी...

15 जूनचे राशिभविष्य:उत्पन्नाच्या दृष्टीने मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस, धनु राशीच्या लोकांना इच्छित...

0
सोमवार, 15 जून रोजी मेष राशीच्या लोकांसाठी जमीन-मालमत्तेशी संबंधित वाद संपण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या लोकांचे उत्पन्न मजबूत होईल आणि मीडिया-संगणकाशी संबंधित लोकांना...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच...

0
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री...
spot_img

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नावावर घोटाळा:ठग बनावट संदेश, फिशिंग लिंक पाठवून लक्ष्य करत आहेत, जाणून...

0
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ची चर्चा सुरू आहे. सायबर ठग या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत. नुकतेच लुधियाना पोलिसांनी...

काजोल म्हणाली- आमिरला चित्रपटांबद्दल जबरदस्त समज:मस्करीत म्हटले- महिलांबद्दलची समजही चांगली, ऐकून अभिनेता हसला

0
आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि 'आमिर खान प्रोडक्शन्स'च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काजोलने आमिरच्या चित्रपटांच्या निवडीचे कौतुक केले. काजोल...
error: Content is protected !!