Homeमहाराष्ट्रघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या उर्वरित जागेवर सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित परिसर विकसित करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. यासोबतच बगीचा, मुलांसाठी खेळणी, झुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याच्या शक्यताही तपासण्यास सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी तिवसा शहराच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती घेतली. पुढील महिन्यात नगराध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नमो उद्यानाच्या कामांची माहिती घेऊन विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक वैभव वानखडे, तहसीलदार मयूर कळसे, मुख्याधिकारी शिवदास मुसळे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, अमोल देशमुख, अधीक्षक रोहन राठोड, अभियंता दयानंद डेहनकर, पाणीपुरवठा अभियंता ऋषिकेश देशमुख, स्वच्छता निरीक्षक राहुल इमले, कर निरीक्षक विकास गावंडे, सूरज शापामोहन, स्वच्छता दूत आशिष नांदगावकर, माऊली कन्सल्टंट प्रा.लि.चे संचालक उमेश राऊत तसेच तिवसा शहरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. विलगीकरणासाठी निधीची गरज घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर कचरा विलगीकरणाचे काम बंद असल्याचे लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांशी त्या मुद्द्यावरही चर्चा केली. निधीची उपलब्धता नसल्याने हे काम बंद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उन्नतीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!