Homeमहाराष्ट्रविधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा...

विधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावा

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे‎उमेदवार नंदकिशोर महाजन यांना‎उमेदवारी नेमकी कोणी मिळवून दिली‎याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट‎चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल‎करण्याच्या दिवशी अंतर्गत नाराजी‎टाळण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी‎दिल्लीवरून उमेदवारी जाहीर झाल्याचे‎स्पष्ट केले होते; मात्र रविवारी‎महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री‎तथा खासदार रक्षा खडसे यांनी‎उमेदवार दिल्लीचा नव्हे तर मंत्री गिरीश‎महाजनांनी दिल्याचा दावा केल्याने‎खळबळ उडाली; मात्र महाजनांनी‎खडसेंचा हा दावा खोडून काढत हा‎निर्णय वैयक्तिक नसून, केवळ दिल्ली‎व पक्षाचा असल्याचे स्पष्ट केले.‎ विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक‎स्वराज्य संस्था मतदारसंघाची‎निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर‎येऊन ठेपली आहे. महायुतीमधील‎अंतर्गत तिढा सुटल्यानंतर रविवारी‎एमआयडीसीत महायुतीचा मेळावा‎झाला. व्यासपीठावर पालकमंत्री‎गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा‎खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,‎भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री‎ संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत सोनवणे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वच नेत्यांनी जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला असून, विजय निश्चित असल्याचा दावा केला. मेळाव्यात नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीवर बोलताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश महाजन आहेत. ही जागा भारतीय जनता पक्षाची पारंपरिक जागा राहिली असून, उत्तर महाराष्ट्राचे सर्व निर्णय गिरीश महाजन यांनीच घेतले आहेत. उमेदवारीसाठी प्रत्येकाला आपले नाव यावे असे वाटणे स्वाभाविक आहे; परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यावर सर्वांना काम करावेच लागते. पक्षात कोणतीही नाराजी नाही. खडसे यांच्या या विधानाने महाजन यांनीच किंगमेकरची भूमिका बजावल्याचे अधोरेखित झाले. रक्षा खडसे यांनी दिलेले हे क्रेडिट मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ नाकारले. ते म्हणाले नंदकिशोर महाजन हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीहून झाला आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी एकाने घेतला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याच्यावर माझा किंवा इतर कोणत्याही नेत्याचा शिक्का मारणे किंवा त्यांना गिरीश महाजनांचा उमेदवार म्हणणे चुकीचे आहे, असे बोलूही नये. महाजन यांनी त्यांच्या वक्तव्याला धन्यवाद म्हणत थेट पक्षश्रेष्ठींचाच शब्द अंतिम असल्याचे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्षांनी बोलणे टाळले‎
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले‎नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात १७ ठिकाणी‎निवडणुका होत आहेत. सर्व १७ जागांवर‎महायुतीचेच उमेदवार जिंकून येतील.‎जळगावची निवडणूक ही केवळ आता‎औपचारिकता उरली आहे. महायुतीतील‎अंतर्गत नाराजीबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न‎विचारला असता चव्हाण यांनी त्यावर‎बोलणे स्पष्टपणे टाळले.‎ ५५० मतांचा पालकमंत्र्यांचा दावा‎ पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी सांगितले की‎निवडणुकीतील ५४ अपक्ष उमेदवार हे दुसऱ्या‎कोणत्याही पक्षाचे नसून आपल्याच‎महायुतीचे आहेत. ७० टक्के निधी खर्च‎करण्याचे अधिकार आमदारांना असून, त्यांनी‎नगरसेवकांना निधी दिला पाहिजे. विधान‎परिषदेवर निवडून आल्यानंतर नंदकिशोर‎महाजन यांनी छोट्या नगरपरिषदांच्या‎विकासाकडे विशेष लक्ष द्यावे.‎ नगरसेवकांची घेतली हजेरी;‎सहलवारी टळल्याने नाराजी‎ मत फुटू नये म्हणून नगरसेवकांना‎अज्ञातस्थळी सहलीवर पाठवण्याची पद्धत‎आहे; मात्र यंदा ही सहलवारी टळल्याने‎काही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर‎होता. मतदारांवर पकड ठेवण्यासाठी‎रविवारी चक्क मेळाव्यातच नगरसेवकांची‎हजेरी घेण्यात आली. तिन्ही‎जिल्हाध्यक्षांवर ही जबाबदारी होती.‎यामध्ये जळगावचे ४७ तर शिवसेनेचे‎(शिंदे गट) २३ नगरसेवक उपस्थित होते.‎जे गैरहजर होते त्यांनी संपर्क साधून‎आपण बाहेरगावी असल्याचे कळवले.‎ मंत्र्यांची मतदारांना गिफ्ट ऑफर‎ मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी गिरीश‎महाजन यांनी नगरपालिकांना थेट फंडाची‎ऑफर दिली. आपल्याकडे ५५० मते आहे.‎ज्या नगरपरिषदा, नगरपालिका सकाळी १०‎वाजेच्या आत १००% मतदान पूर्ण करतील,‎त्यांना निधी दिला जाईल असे सांगितले.‎ महायुतीची रणनीती अशी‎ महायुतीचे पदाधिकारी‎प्रत्येक गावात जाऊन‎नगरसेवकांना मतदान‎कसे करावे, याचे‎प्रात्यक्षिक देणार.‎
मतदानाच्या दिवशी ७‎बूथ असून, प्रत्येक‎बूथची जबाबदारी‎निश्चित आमदारांवर‎सोपवण्यात आली आहे.‎
महायुती उमेदवाराला‎राज्यात जास्त मताधिक्य‎मिळवून देण्याचा निर्धार.‎
सकाळी १० वाजेच्या‎आत १०० % मतदान‎करणाऱ्या नपाला निधी.‎
ज्या मतदारांना काही‎कारणास्तव मतदान‎करणे शक्य नाही,‎त्यांच्या जागी येणाऱ्या‎दुसऱ्या व्यक्तीची‎माहिती तत्काळ दिली‎जाणार.त्यादृष्टीने‎नियोजन बैठकीत‎करण्यात आले.‎
मतदार असलेल्या‎सर्व नगरसेवकांना‎मतदानाच्या आदल्या‎दिवशी बाहेरगावी न‎जाण्याच्या कडक‎सूचना देखील बैठकीत‎ देण्यात आल्या आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!