Homeमहाराष्ट्रRohit Pawar on India Pakistan War Says Separate Balochisatan and Divide Pakistan...

Rohit Pawar on India Pakistan War Says Separate Balochisatan and Divide Pakistan into two Part | पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी त्याचे तुकडे करण्याची गरज: रोहित पवारांचे विधान, म्हणाले – इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घ्या – Pune News

पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, तर बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले.

?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी सायंकाळी युद्धविरामाची घोषणा झाली होती. युद्धबंदीच्या घोषणेच्या तीन तासांतच पाकिस्ताने आपला रंग दाखवत भारताच्या सीमावर्ती भागात 11 ठिकाणी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीच सैन्याने पाकच्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर देत त्याचा डाव हाणून पाडला. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी उपरोक्त विधान केले.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

युद्धबंदी होऊन तीन तास उलटत नाहीत तोच पाकिस्तानने ड्रोनहल्ले करत पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानसारखा कुरापतखोर देश कधीही सुधारणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल तर 1971 मध्ये ज्याप्रमाणे स्व. इंदिरा गांधीनी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता कणखर भूमिका घेत पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याचप्रकारे बलुचिस्तानला स्वतंत्र करत सध्याच्या पाकचे आणखी दोन तुकडे करण्याची आज गरज आहे. सेना सज्ज आहे, सेनेवर देशाचा विश्वास आहे, सरकारने निर्णय घ्यावा, संपूर्ण देश आणि सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सीमावर्ती भागात पुन्हा ब्लॅकआउट

रात्री 8 वाजल्यापासून जम्मू-काश्मीरमधील अखनूर, पूंछ, नौशेरा, श्रीनगर, आरएस पुरा, सांबा, उधमपूर येथे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. राजौरीमध्ये तोफांचा मारा करण्यात आला. उधमपूरमध्ये ड्रोन हल्ला झाला. युद्धबंदीच्या घोषणेनंतर, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट रद्द करण्यात आला. पण, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारानंतर पुन्हा ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

भारतीय सैन्याला कडक पावले उचलण्याचे आदेश

दुसरीकडे, पाकिस्तानचे अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तानने परिस्थितीला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकने सामंजस्य कराराचे उल्लंघन केले. भारतीय सैन्याला या विरोधात कडक पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सचिव विक्रम मिस्त्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत दिली.

हे ही वाचा…

भारत नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक:त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर त्या स्वागतार्ह, युद्धविरामानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या घोषनेनंतर सीमावर्ती भागाता नागरिकांमध्ये आनंदाने वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तान मधील युद्धबंदीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत नेहमीच शांततेचा आणि संवादाचा समर्थक आहे. त्यादिशेने काही घडामोडी घडत असतील तर त्या स्वागतार्ह असल्याचे शरद पवार म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!