Homeदेश-विदेशऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

ऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश;मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय

     पंढरपूर : कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तात्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.

     वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे यांनी भक्कम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे.

न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते. काकड आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्व कृती याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती केवळ ‘दगडाची मूर्ती’ समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते. आतापर्यंत ४ वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे.

     ‘महाकालेश्वर मंदिर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा न्यायालयात संदर्भ देण्यात आला. यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले असून, न्यायालयाने त्याचीही नोंद घेतली आहे.

      या निर्णयावर समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले? याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मूर्ती संवर्धनासाठी ‘आयुर्वेदिक वज्रलेप’ हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आम्हाला आशा आहे.

 

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

टीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रता भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयटीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रत भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हानकोलकाता6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराविधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)...

धारणीच्या सुसर्दा येथील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा, ऑगस्टपासून नवीन सत्र

0
धारणी तालुक्यातील सुसर्दा येथील शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रासाठी...

लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू:एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले...

0
लखनऊ कोचिंग अग्निकांडात 15 लोकांचा बळी गेला. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. हे लोक गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी येत होते. ज्यावेळी अपघात झाला,...

संताची दुःखी व्यक्तीला शिकवण:यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली ऊर्जा विखुरण्याऐवजी एका दिशेने लावतो

0
फार पूर्वीच्या काळी एक माणूस गरिबीमुळे खूप दुःखी होता. त्याच्याकडे चांगले घर नव्हते, पुरेसे अन्न नव्हते आणि जीवनात कोणतीही स्थिरता नव्हती. तो नेहमी...
spot_img

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...

विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...

0
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...

0
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....

मोटोरोला एज 70 फ्युजनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च:स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, मिलिटरी...

0
टेक कंपनी मोटोरोलाने मार्चमध्ये एज 70 फ्युजन लॉन्च केले होते, आज कंपनीने त्याचे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेले नवीन व्हेरिएंट लॉन्च केले...
error: Content is protected !!