“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण
.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य अभिवादन करण्यात आले. उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात शिवरायांच्या अलोट कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करून स्वराज्याच्या आदर्शांना वंदन करण्यात आले. या प्रसंगी महापौर गाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापौर गाडे म्हणाल्या, रायगड किल्ल्यावर पार पडलेला सोहळा हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, आत्मसन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा विजय होता. या ऐतिहासिक घटनेमुळे मराठी अस्मितेला नवे बळ मिळाले. राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवा ही मूल्ये अंगीकारूनच आपण शिवरायांना खरी आदरांजली वाहू शकतो,” असे आवाहन महापौरांनी केले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपालीताई बारस्कर यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी घेतलेल्या कडक भूमिकेचे स्मरण केले. शिवरायांचे लोककल्याणकारी निर्णय आजही राज्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती वर्षा सानप यांनी शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणातील अथांग योगदानाचा गौरव केला. स्वराज्याच्या स्थापनेसाठी मावळ्यांनी केलेला संघर्ष आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची शिवरायांची शिकवण आजही आपल्यासाठी दिशादर्शक आहे.
या संपूर्ण सोहळ्यादरम्यान उपस्थितांनी दिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या गगनभेदी जयघोषाने पालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता.
































