Homeदेश-विदेश१ 1984. 1984 वर कॉंग्रेसने केलेल्या चुकांवर राहुल गांधी शीख दंगल राम...

१ 1984. 1984 वर कॉंग्रेसने केलेल्या चुकांवर राहुल गांधी शीख दंगल राम मंदिर भाजपाला लक्ष्य देखील नवीनतम अद्यतन माहित आहे.


राहुल गांधी बातम्या: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुका आणि तत्सम काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेसनं काही चुकीच्या भूमिका घेतल्या. अर्थात त्या वेळी आपण पक्षाचा भाग नव्हतो. मात्र त्या चुकांची जबाबदारी मात्र आपण स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. 1980 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचंच होतं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

अमेरिकेतील ब्राउन विश्वविद्यालयातील ‘वॉटसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’मध्ये आयोजित एका संवादसत्रादरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली. याच कार्यक्रमातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर भारतीय माध्यमांमध्ये त्यासंदर्भातील चर्चांना वाव मिळाला.

काय म्हणाले राहुल गांधी?

अमेरिकेतील या कार्यक्रमामध्ये एका शीख विद्यार्थ्याने 1984 मध्ये झालेल्या हिंसेवरून प्रश्न उपस्थित करत या समुदायाशी ताळमेळ साधण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? असा प्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यानं राहुल गांधी यांच्या गतवेळीच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख  करत त्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्याचीसुद्धा आठवण करून दिली. या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

‘मला नाही वाटत की, शीखांना कोणत्या गोष्टीचं भय आहे. मी जे वक्तव्य केलं होतं त्याच मी असं म्हणालो होतो की, खरंच आपल्याला असा भारत देश हवा आहे जिथं नागरिकांना आपल्या धर्माविषयी व्यक्त होतानाही संकोचलेपणा वाटेल? राहिला मुद्दा काँग्रेसच्या चुकांचा, तर त्यातल्या अनेक चुका तेव्हा झाल्या जेव्हा मी पक्षाचा भाग नव्हतो. मात्र, काँग्रेस पक्षानं गतवर्षांमध्ये ज्या काही चुका केल्या आहेत त्यांची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारतो.’

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच होतं असं मी अनेकदा जाहीरपणे म्हणालो आहे असं म्हणताना आपण स्वत: अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात शीख समुदायाशी आपलं असणारं चांगलं नातं अधोरेखित करताना त्यांनी आपली भूमिक मांडली. त्यांच्या याच व्हिडीओतील काही भाग भाजपनं हेरला आणि या पक्षातील आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना तो विद्यार्थी निष्कारण भीती पसरवणाऱ्या त्या वक्तव्याची आठवण करून देत असल्याची भूमिका मांडली.

या कार्यक्रमादरम्यान प्रभू श्रीरामाचा उल्लेख पौराणिक व्यक्ती म्हणून केल्यानंही भाजपनं राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आपलं मत मांडताना ते म्हणाले होते, ‘सर्वच महान राजनैतिक विचारवंत, समाजसुधारक गुरू नानक, कर्नाचकातील बसवेश्वर, केरळातील नारायण गुरू, फुले, महात्मा गांधी, आंबेडकर हे सर्वजण तुम्हाला एका दृष्टीकोनातून पाहतात. यापैकी कोणीच कट्टरतावादी नाही. किंबहुना आपल्या संविधानातच म्हटलंय की, सत्य आणि अहिंसाच कायमच सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात.’

भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही- राहुल गांधी

आपल्यासाठी ही मूल्य भारतीय परंपरा आणि भारतीय इतिहासाचा आधार आहेत असं सांगताना मी अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही, ज्याचा आपण महान मानतो आणि जो वरील गटांमध्ये मोडत नाही. ‘आपली सर्वच पौराणिक व्यक्तीत्वं, अगदी प्रभू श्रीरामही तसेच होते. ते दयावान होते, क्षमाशील होते. त्यामुळं भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही. मी स्वत: हिंदू विचारसरणीला अधिक बहुलवादी आणि अधिक आपलेपणाची मानतो. अधिक स्नेही, सहिष्णू आणि उदारमतवादी मानतो’, असं राहुल गांधी म्हणाले होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!