शैक्षणिक बातम्या: भारतभूमीवर आक्रमण करून अनेक संस्थानांना आव्हान देणारे आणि इतिहासात क्रूर शासक म्हणून नोंद करण्यात आलेल्या मुघल साम्राज्याविषयी आजवर शालेय जीवनात पाठ्यपुस्तकांमधून प्राथमिक स्वरुपातील माहिती मिळत राहिली. आता मात्र मोदी सरकारनं भारतातून हद्दपार झालेल्या या मुघल साम्राज्याच्या इतिहासालासुद्धा पाठ्यपुस्तकांमध्ये जागा न देण्याचा पवित्रा घेतल्याचं स्पष्ट होत आहे. (NCERT New 7th Class History Book)
मुघलांचा इतिहास हद्दपार
NCERT च्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार करण्यात आला आहे. ज्यामुळं आता इयत्ता सातवीच्या NCERTच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी भारतीय राजघराणी, महाकुंभचे संदर्भ, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : …म्हणून मुंबईहून थेट काश्मीरला आलो; पहलगाममध्ये पोहोचताच अतुल कुलकर्णीने सांगितलं खरं कारण
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत. याआधी कोविड काळात मुघल आणि दिल्ली सल्तनतवरील काही अध्याय कमी करण्यात आले होते. नवीन पुस्तके आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लागू होणार आहेत.




























