कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोविंदपूर (चडचण) या ठिकाणी झालेल्या भीषण गोळीबारात तब्बल सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे भयानक हत्याकांड जमिनीच्या जुन्या वादातून घडले असल्याचे समोर येत आहे. एकाच वेळी आणि एकाच कारणावरून सहा जणांचे प्राण गेल्याने संपूर्ण विजापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसराचा ताबा घेतला आहे. सध्या पोलिसांकडून या सामूहिक हत्याकांडाचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. गोळीबार करत सहा जणांची निर्घृण हत्या विजापूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि थरारक घटना घडली. गावात आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार करत सहा जणांची निर्घृण हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. याच जुन्या वैमनस्यातून हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात या भयंकर गोळीबारात चंदू निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर नदाफ यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच वेळी सहा जणांचे प्राण गेल्याने सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ गावात दाखल झाला असून, संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण विजयपूर जिल्हा हादरून गेला असून, भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे, तसेच पसार झालेल्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, या भयंकर घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आणि मृतांची संपूर्ण ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.
Source link
कर्नाटकात थरार!:जमिनीच्या वादातून भीषण गोळीबार, तब्बल 6 जणांची निर्घृण हत्या; आरोपींचा शोध सुरू
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
अमेरिकेत बनावट पिझ्झा ऑर्डरच्या बहाण्याने भारतीय तरुणाची हत्या:तेलंगणाचा अंशुल डिलिव्हरी देण्यासाठी पोहोचला होता; कट...
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे तेलंगणाच्या 28 वर्षीय अंशुल कुंचा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुटुंबाचा आरोप आहे की अंशुलला बनावट पिझ्झा ऑर्डर देऊन...
पुढील वर्षापासून 62% लोकांसाठी गृह-ऑटो कर्ज कठीण:नवीन नियम लागू होतील, 730 पेक्षा कमी सिबिल...
आरबीआयचा नवीन नियम ‘ईसीएल डायरेक्शन-2026’ 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने कर्जाचे दोन हप्ते (ईएमआय) भरण्यास चुकला, तर...
जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
पुढील वर्षापासून 62% लोकांसाठी गृह-ऑटो कर्ज कठीण:नवीन नियम लागू होतील, 730 पेक्षा कमी सिबिल...
आरबीआयचा नवीन नियम ‘ईसीएल डायरेक्शन-2026’ 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने कर्जाचे दोन हप्ते (ईएमआय) भरण्यास चुकला, तर...
वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...






























