देशभरात दररोज अनेक रस्ते अपघातात होत असतात. या रस्ते अपघातात कोणाचा मृत्यूदेखील होतो. रस्ते अपघातातील एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दोन सख्या भावांचा काही तासांच्या अंतराने रस्ते अपघातात जीव गेला आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळलं असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
नियतीचा मनात काय असतं हे कोणी सांगू शकतं नाही, पण नियतीचा खेळ किती क्रूर असू शकतो याचा धक्कादायक अनुभव सरगुजा जिल्ह्यातील एका कुटुंबाला आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवरी गावातील योगेंद्र पैकरा हा 33 वर्षीय तरुण हा सूरजपूर जिल्ह्यातील लटोरी गावात किराणाचं दुकान चालवतो. सोमवारी रात्री उशिरा दुकान बंद करुन तो घराकडे निघाला होता. पण अंबिकापूर-वाराणसी स्टेट हायवेवरील चठिरमाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्याची भरधाव दुचाकी जोरदार धडकली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
बातमी ऐकून निघाला अन्…
त्यानंतर या घटनेची माहिती कुटुंबाला देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पोलिसांनी पाठवला. भावाचा मृत्यूची बातमी लहान भावाला मोबाईलवर कळली आणि तो तातडीने घरातून निघाला. योगेंद्रचा धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा 29 वर्षीय तरुणासोबत नियतीने आपला खेळ दाखवला. लखनपूरहून अंबिकापूरकडे जाताना नॅशनल हायवे- 130 वर एका अज्ञात कारने त्याचा दुकाचीला प्रचंड वेगाने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी लखनपूरमधील रुग्णालयात दाखल केलं. तिथल्या डॉक्टराने त्याला प्राथमिक उपचारानंतर बिलासपूरला मोठा रुग्णालयात नेण्यासाठी सांगितलं.
पण बिलासपूरला त्याला हलवण्यात आलं आणि उपचारही सुरु झाले. पण पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. काही तासांच्या अंतराने एकाच दिवशी कुटुंबातील दोन कर्तृत्ववान मुले गमावली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
धक्कादायक म्हणजे योगेंद्र आणि कुशन यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांच्या पश्चात त्यांची आई आणि अन्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह एकाचवेळी गावात पोहोचताच संपूर्ण गावातील लोकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गेलेल्या प्रत्येकाचे मन हे दृश्य पाहून हेलावले.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १: सरगुजा जिल्ह्यातील ही दुर्दैवी घटना नेमकी काय आहे?
उत्तर: सरगुजा जिल्ह्यातील केवरी गावातील दोन सख्ख्या भावांचा काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. मोठ्या भावाचा ट्रकला धडकून मृत्यू झाला, तर लहान भाऊ मृतदेह घेण्यासाठी निघाला असता रस्त्यात कार अपघातात जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावला. यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
प्रश्न २: मोठा भाऊ योगेंद्र पैकरा यांचा अपघात कसा घडला?
उत्तर: योगेंद्र पैकरा (वय ३३) हे सूरजपूर जिल्ह्यातील लटोरी गावात किराणा दुकान चालवत होते. सोमवारी रात्री दुकान बंद करून गावाकडे परतताना अंबिकापूर-वाराणसी स्टेट हायवेवरील चठिरमाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्यांची भरधाव दुचाकी धडकली. धडका इतकी भीषण होती की, योगेंद्र जागीच मृत्यू पावले. गांधीनगर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
प्रश्न ३: लहान भाऊ कुशन सिंह पैकरा यांच्याशी काय घडले?
उत्तर: योगेंद्रच्या अपघाताची बातमी ऐकताच धाकटा भाऊ कुशन सिंह पैकरा (वय २९) लखनपूरहून अंबिकापूरकडे मृतदेह घेण्यासाठी निघाला. वाटेत नॅशनल हायवे-१३० वर एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कुशन गंभीर जखमी झाला आणि लखनपूर रुग्णालयात दाखल केल्यानंतर अपोलो हॉस्पिटल, बिलासपूर येथे हलवले गेले. तेथे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

































