Homeदेश-विदेशPowai kidnapped similar case World Most Brutal School Massacre Beslan Horror 2004...

Powai kidnapped similar case World Most Brutal School Massacre Beslan Horror 2004 Remembered | मुलींवर अत्याचार, तहानलेल्या मुलांना टॉयलेटचं पाणी…330 मृत्यू, 2004 साली जगात घडलं होतं सर्वात क्रूर हत्याकांड


मुंबई मुले बंधक: मुंबईच्या पवई भागात 17 निरागस मुलांना बंधक बनवण्याच्या प्रकरणाने देशासह संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी गेलेली ही मुलं अचानक बेपत्ता झाली आणि काही वेळातच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला  ज्यामध्ये त्याने स्वतः या मुलांना बंधक ठेवल्याची कबुली दिली होती. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात यश आलं, मात्र या घटनेने 21 वर्षांपूर्वी घडलेल्या जगातील सर्वात भीषण बेसलान स्कूल नरसंहाराची आठवण जागी केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

2004 चा बेसलान नरसंहार

3 सप्टेंबर 2004, रशियातील बेसलान शहर. त्या दिवशी शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात होते. पण काही क्षणांतच सगळं काही बदललं. सशस्त्र चेचेन दहशतवाद्यांनी शाळेत घुसून शेकडो मुलं, शिक्षक आणि पालकांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं. तीन दिवस चाललेल्या या वेढ्यात 330 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात सर्वाधिक बळी हे लहान मुलांचे होते. दहशतवाद्यांनी मुलांना आणि स्त्रियांना शाळेच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये बंद केलं, आणि तिथेच बास्केटबॉल कोर्टाच्या छतावर स्फोटकं लावली होती. रशियन फौजेला मुलांमुळे आक्रमक कारवाई करता येत नव्हती.

हे ही वाचा: ‘असा माणूस हवा जो मला प्रेग्नेंट करेल… मी 25 लाख देणार’, आकर्षक ऑफर ऐकून पुण्यातील कंत्राटदार गेला अन्…

काय होती मागणी?

रशियन सरकारने नकार दिला, आणि तिसऱ्या दिवशी कमांडो ऑपरेशन सुरू झालं. गोळीबार, स्फोट आणि भीषण आगीमध्ये शेकडो निरपराधांचा बळी गेला.

निर्दयतेचा कळस

या नरसंहारादरम्यान दहशतवाद्यांनी अमानुषतेचा कळस गाठला होता. काही मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, अनेक मुलं उपासमारी व तहानेने तडफडली. पाणी मागितल्यावर त्यांना टॉयलेटमधलं पाणी पिण्यास भाग पाडण्यात आलं. अनेकांच्या शरीरावर जखमा, गॅसचा परिणाम आणि स्फोटांमुळे मृत्यू झाला. ही घटना जगभरातील मानवतेच्या इतिहासातील सर्वात काळी घटना म्हणून नोंदली गेली.

हे ही वाचा: Biggest Housing Deal: मुंबई, दिल्ली नव्हे तर ‘या’ ठिकाणी झाली सर्वात मोठी हाऊसिंग डील! Per Sqft चा दर तब्बल 1.7 लाख!

चेचेन दहशतवादी कोण आहेत?

चेचेन्या हे रशियाच्या उत्तरेकडील छोटे क्षेत्र. 1864 मध्ये रशियाने ताबा मिळवला, पण चेचेन्याने कधीच रशियाचा भाग म्हणून स्वतःला मान्य केलं नाही. सुन्नी मुस्लिम बहुल हा प्रदेश सतत रशियन सेनेशी संघर्ष करत आला आहे. याच संघर्षातून निर्माण झाले दहशतवादी गट, ज्यांनी बेसलानमध्ये हे अमानवी कृत्य केलं.

हे ही वाचा: विजयच्या सभेतील मृताच्या पत्नीने परत केली 20 लाखांची मदत; म्हणाली, “मी अपेक्षा केली होती की…”

मुंबईतील घटना – पवईत 17 मुलं बंधक

मुंबईच्या पवईतील RA Studio मध्ये 17 मुलं ऑडिशनसाठी गेली होती. लंच ब्रेकनंतरही मुलं बाहेर आली नाहीत तेव्हा पालक चिंतेत पडले. याचवेळी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ पाठवून सांगितलं की त्याने मुलांना बंधक ठेवलं आहे आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तो स्टुडिओला आग लावेल. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात आलं आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!