मुंबई मुले बंधक: मुंबईच्या पवई भागात 17 निरागस मुलांना बंधक बनवण्याच्या प्रकरणाने देशासह संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी गेलेली ही मुलं अचानक बेपत्ता झाली आणि काही वेळातच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये त्याने स्वतः या मुलांना बंधक ठेवल्याची कबुली दिली होती. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात यश आलं, मात्र या घटनेने 21 वर्षांपूर्वी घडलेल्या जगातील सर्वात भीषण बेसलान स्कूल नरसंहाराची आठवण जागी केली आहे.
2004 चा बेसलान नरसंहार
3 सप्टेंबर 2004, रशियातील बेसलान शहर. त्या दिवशी शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात होते. पण काही क्षणांतच सगळं काही बदललं. सशस्त्र चेचेन दहशतवाद्यांनी शाळेत घुसून शेकडो मुलं, शिक्षक आणि पालकांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं. तीन दिवस चाललेल्या या वेढ्यात 330 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात सर्वाधिक बळी हे लहान मुलांचे होते. दहशतवाद्यांनी मुलांना आणि स्त्रियांना शाळेच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये बंद केलं, आणि तिथेच बास्केटबॉल कोर्टाच्या छतावर स्फोटकं लावली होती. रशियन फौजेला मुलांमुळे आक्रमक कारवाई करता येत नव्हती.
हे ही वाचा: ‘असा माणूस हवा जो मला प्रेग्नेंट करेल… मी 25 लाख देणार’, आकर्षक ऑफर ऐकून पुण्यातील कंत्राटदार गेला अन्…
काय होती मागणी?
रशियन सरकारने नकार दिला, आणि तिसऱ्या दिवशी कमांडो ऑपरेशन सुरू झालं. गोळीबार, स्फोट आणि भीषण आगीमध्ये शेकडो निरपराधांचा बळी गेला.
निर्दयतेचा कळस
या नरसंहारादरम्यान दहशतवाद्यांनी अमानुषतेचा कळस गाठला होता. काही मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, अनेक मुलं उपासमारी व तहानेने तडफडली. पाणी मागितल्यावर त्यांना टॉयलेटमधलं पाणी पिण्यास भाग पाडण्यात आलं. अनेकांच्या शरीरावर जखमा, गॅसचा परिणाम आणि स्फोटांमुळे मृत्यू झाला. ही घटना जगभरातील मानवतेच्या इतिहासातील सर्वात काळी घटना म्हणून नोंदली गेली.
हे ही वाचा: Biggest Housing Deal: मुंबई, दिल्ली नव्हे तर ‘या’ ठिकाणी झाली सर्वात मोठी हाऊसिंग डील! Per Sqft चा दर तब्बल 1.7 लाख!
चेचेन दहशतवादी कोण आहेत?
चेचेन्या हे रशियाच्या उत्तरेकडील छोटे क्षेत्र. 1864 मध्ये रशियाने ताबा मिळवला, पण चेचेन्याने कधीच रशियाचा भाग म्हणून स्वतःला मान्य केलं नाही. सुन्नी मुस्लिम बहुल हा प्रदेश सतत रशियन सेनेशी संघर्ष करत आला आहे. याच संघर्षातून निर्माण झाले दहशतवादी गट, ज्यांनी बेसलानमध्ये हे अमानवी कृत्य केलं.
हे ही वाचा: विजयच्या सभेतील मृताच्या पत्नीने परत केली 20 लाखांची मदत; म्हणाली, “मी अपेक्षा केली होती की…”
मुंबईतील घटना – पवईत 17 मुलं बंधक
मुंबईच्या पवईतील RA Studio मध्ये 17 मुलं ऑडिशनसाठी गेली होती. लंच ब्रेकनंतरही मुलं बाहेर आली नाहीत तेव्हा पालक चिंतेत पडले. याचवेळी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ पाठवून सांगितलं की त्याने मुलांना बंधक ठेवलं आहे आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तो स्टुडिओला आग लावेल. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात आलं आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.

































