रिअल इस्टेट बातम्या: गेल्या दोन दशकांचा आढावा घेतल्यास भारतामध्ये अनेक शहरं मेट्रो शहरं होण्याच्या दिशेनं पावलं उचलताना दिसली तर जी शहरं देशाच्या महानगरांच्या यादीत आहेत त्यांनी प्रगतीच्या वाटेवर आणखी पुढचे टप्पे गाठल्याचं पाहायला मिळालं. आता हीच शहरं, किंबहुना भारतात विकासाची एक नवी लाट येण्यास सज्ज असून पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये देशातील शहरांचा मोठा विकास होताना दिसत आहे. थोडक्यात ज्या शहरांची ओळख देशात सध्या लहान शहरं म्हणून आहे, त्याच शहरांचा कायापालट होणार आहे.
कोणती शहरं ठरु शकतात, ‘लंबी रेस का घोडा’
देशातील कैक मोठ्या विकासकांनी भविष्यातील संधी आणि देशाचा एकंदर होणारा विकास पाहता काही अशा शहरांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे जी पाहता, तिथं संधी मिळताच गुंतवणूक करणं सामान्यांसाठीसुद्धा एक मोठी आणि तितकाच नफा देणारी सुवर्णसंधी देऊन जाणार आहे. सहसा मोठ्या विकासक कंपन्या अशा ठिकाणी मोठे भूखंड खरेदी करतात जिथं येत्या काळात विमातळ, एक्स्प्रेस वे किंवा मेट्रो या आणि यासारखे विकासप्रकल्प साकारले जाण्याची अपेक्षा असते किंवा असे प्रकल्प प्रस्तावित असतात. अशाच एका विकासक कंपनीनं 2026 मधील लँड बँक आकडेवारीला खुलासा केला.
403 एकर इतका प्रचंड भूखंड आणि…
झी बिझनेसच्या वृत्तानुसार शोभा लिमिटेडच्या इन्वेस्टर प्रेझेंटेशननुसार कंपनीकडे 403 एकरची लँड बँक आहे. यामध्ये बंगळुरू येथील 205 एकर, तामिळनाडूतील राजधानी चेन्नई आणि कोईंबतूरमध्ये 77 एकर, गुरुग्राममध्ये 44 एकर, पुण्यात 34 एकर आणि ग्रेटर नोएडामध्ये 12 एकर लँड बँक आहे.
पुढची 5-10 वर्षे शहरं झपाट्यानं मोठी होणार…
विकासकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले भूखंड पाहता लँड बँक आणि बाह्य परिसरामधील सक्रियतेचे हे मोठे संकेत असून, पुढच्या किमान 5 ते 10 वर्षांमध्ये ही शहरं झपाट्यानं मोठी होण्याचेच हे संकेत आहेत. दिल्ली एनसीआर, पुणे, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मुख्य शहरांबाहेर मोठ्या टाऊनशिपर आणि मिनी शहरं आकार घेतील.
घर खरेदीदारांना काय फायदा?
गुंतवणूकदारांना या ट्रेंडचा फायदा होणार असून, यामध्ये जिथं विकासकांकडून जमीन खरेदी केली जात आहे, तिथंच पुढे जाऊन सुनियोजित शहरं उभी राहणार आहेत. जिथं, शाळा, रुग्णालयं, श़ॉपिंग सेंटर आणि उत्तम दळवळणाच्या सुविधा असल्यानं ही शहरं आत्मनिर्भर असतील. ज्यामुळं येत्या काळात घर खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या मंडळींनी यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं असेल. मुंबई, पुणं, बंगळुरूमध्ये मुख्य प्रवाहातील ठिकाणआंना वगळून आकार घेणाऱ्या टाऊनशीपचे दर भविष्यात गगनाला भिडण्याचे संकेत यातून मिळत आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
भारतातील कोणती शहरं पुढील 5-10 वर्षांत झपाट्याने विकसित होण्याची शक्यता आहे?
दिल्ली एनसीआर (गुरुग्राम, ग्रेटर नोएडा), पुणे, बंगळुरू आणि मुंबईसारख्या मुख्य शहरांबाहेरील परिसरांमध्ये मोठ्या टाऊनशिप आणि मिनी शहरांचा विकास होईल. याशिवाय, चेन्नई आणि कोयंबतूरसारख्या तामिळनाडूतील शहरांमध्येही झपाट्याने वाढ अपेक्षित आहे.
विकास कंपन्यांनी गुंतवणूक का केली?
विकासक कंपन्या विमानतळ, एक्सप्रेस वे किंवा मेट्रोसारख्या प्रस्तावित प्रकल्पांजवळील भूखंड खरेदी करतात, जिथे भविष्यात मोठा विकास होण्याची अपेक्षा असते. हे भूखंड खरेदी करून ते सुनियोजित टाऊनशिपमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे नफा आणि शहरांचा विकास दोन्ही होतात.
या विकासाचा घर खरेदीदारांना काय फायदा होईल?
या भागांत शाळा, रुग्णालये, शॉपिंग सेंटर आणि उत्तम वाहतूक सुविधांसह आत्मनिर्भर शहरं उदयास येतील. गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळेल, विशेषतः मुंबई, पुणे, बंगळुरूतील टाऊनशिपच्या दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. आता गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन नफा मिळू शकतो.
































