भंडारा – स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे दाखल केला आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो की बारगळतो? याकडे नगरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सदस्यीय लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 अशा दोन टप्प्यात पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, भाजपा 6, काँग्रेस 2 व अपक्ष 1 असे एकूण 17 नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रिवेणी पोहरकर यांची निवड झाली होती. त्यानंतर उपाध्यक्ष प्रदीप तितीरमारे यांनी राजीनाता दिल्यानंतर भाजपच्या लता रोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विद्यमान नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपंचायतीच्या कारभारात लोकशाही पद्धतीने काम करण्याऐवजी एकतर्फी व मनमानी पद्धतीचा अवलंब केला. निर्णय प्रक्रियेतून डावलल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. त्यांनी अनेकदा नगरसेवकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपंचायतीत सामूहिक नेतृत्वाच्या तत्वाला हरताळ फासून सर्व अधिकार नगराध्यक्षांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नगराध्यक्षांचे पती हे नगरपंचायतीच्या कारभारात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप करतात. अध्यक्षांच्या एकतर्फी व मनमानी कारभारामुळे नगरपंचायतीमध्ये सुसंवाद, सहकार्य आणि लोकशाही मूल्यांना बाधा पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनावर विपरित परिणाम झाला आहे. या सर्व बाबींमुळे 13 नगरसेवकांनी त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करण्यासाठी 1 जुलैला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावेळी संदीप भांडारकर, राजेश निंबेकर, महेश आकरे, अश्विन धरमसारे, भूपेंद्र धरमसारे, सचिन भैसारे, प्रदीप तितीरमारे, विपुल कांबळे, विभा हजारे, कांता निर्वाण, निशा मोहनकर, सविता सोनवाणे, सारिका बशेशंकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष सभेचे आयोजन मंगळवारी लाखनी नगरपंचायतीच्या 13 नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर मत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जुलैला दुपारी 12 वाजता नगरपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे नगर सेवकांची पळवापळवी होते की, तटस्थतेची भूमिका घेतली जाते, याकडे लाखनी वासियांचे लक्ष लागले आहे.
Source link
लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड, 7 जुलैच्या विशेष सभेकडे लक्ष
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























