Homeदेश-विदेशहिमालय अंतर्गत लपलेले मोठा धोका भारत दोन भागांमध्ये विभागेल

हिमालय अंतर्गत लपलेले मोठा धोका भारत दोन भागांमध्ये विभागेल


भारत दोन भागांमध्ये विभागला जाईल: जगभरात अनेक भौगोलिक घडामोडी घडत आहेत. यांचा परिणान विविध देशांवर तसेच प्रांतावर होत आहे. या भौगोलिक घडामोडीचा जबरदस्त फटका भारताला बसणार आहे. हा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. भारतीय खंड दोन भागत विभागला जाणार आहे. जमिनीचा आकार, नद्यांची दिशा आणि पर्वतांची स्थिती बदलणार अशी देखील भिती व्यक्त केली जात आहे.  हिमालयाच्या खालीच या धोक्याचा केंद्रबिंदू आहे.

अमेरिकेच्या एका नवीन वैज्ञानिक अहवालात भारताच्या भौगोलित स्थितीतबाबात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या अहवालाने भारतासह संपूर्ण आशिया खंड चिंतेत आला आहे.  शास्त्रज्ञांच्या मते, भारत ज्या टेक्टोनिक प्लेटवर आहे ती आतून तुटू लागली आहे. त्याचा परिणाम येत्या काळात विनाशकारी भूकंप, हवामानात बदल आणि जमिनीच्या नकाशात मोठे बदल घडवून आणू शकतो.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे भूभौतिकशास्त्रज्ञ सायमन क्लेम्पेरर आणि त्यांच्या टीमने एक आश्चर्यकारक प्रक्रिया ओळखली आहे. ज्याला त्यांनी ‘डिलेमिनेशन’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ असा की भारतीय टेक्टोनिक प्लेटचा जड, दाट भाग आता हळूहळू तुटत आहे आणि पृथ्वीच्या खोलवर बुडत आहे. जणू काही आपल्या जमिनीचा एक भाग शांतपणे पृथ्वीच्या आत सरकत आहे. अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या एका नवीन अभ्यासानुसार, गेल्या 60 दशलक्ष वर्षांपासून भारतीय प्लेट उत्तरेकडे सरकत आहे. या टक्करमुळे हिमालयासारखे पर्वत तयार झाले होते, परंतु आता ही टक्कर धोकादायक वळण घेत आहे.

संशोधनातून असे दिसून आले आहे की प्लेटचे जड भाग आता स्वतःला आधार देऊ शकत नाहीत. हे भाग तुटत आहेत आणि खाली जात आहेत. ही प्रक्रिया मंद आहे परंतु त्याचे परिणाम मोठे असू शकतात. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की हिमालय आणि त्याच्या शेजारील उत्तर भारतातील भाग सर्वात संवेदनशील आहेत. तेथे जमिनीखाली आधीच खूप दाब आहे.
जर प्लेट्स तुटण्याचे हे प्रमाण वाढले तर उत्तर भारत, नेपाळ, तिबेट आणि ईशान्य भारतात भूकंपांची तीव्रता आणि वारंवारता वाढू शकते. उत्तर भारत आधीच भूकंपप्रवण क्षेत्र आहे. आता ते अधिक संवेदनशील बनले आहे. प्लेट तुटल्यास जमिनीचा आकार, नद्यांची दिशा आणि पर्वतांची स्थिती देखील बदलू शकते. जमिनीची उंची आणि रचनेतील बदल देखील मान्सून आणि हवामान चक्रांवर परिणाम करू शकतात.

दिल्ली, देहरादून, गुवाहाटी किंवा शिलाँग सारखी मोठी शहरे अशा भागात आहेत जिथे सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे असेल. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही प्रक्रिया सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याचा अर्थ वेळ संपत आहे परंतु याबाबत कृती करणे आवश्यक आहे. भारतावर सतत देखरेखीची आवश्यकता आहे. यासोबतच, भूकंप सुरक्षा मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासोबतच, जनतेनेही या परिस्थितीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे ‘एक...

0
भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या...

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!