सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर मंगल कार्यालय, डाबकी रोडवरील राजेश्वर कॉन्व्हेंट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला. या दोन्ही शिबिरांमध्ये बाल साधकांचा प्रतिसाद लाभला. दररोज सकाळी ९ ते १२ या वेळेत झालेल्या या शिबिरांमध्ये लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणावयाचे श्लोक, आरोग्यासाठी विविध व्यायाम प्रकार, भारतातील थोर राष्ट्रीय पुरुष व संत यांचा दैदीप्यमान इतिहास, मंदिर आणि त्याचे महत्त्व, मंदिरात देवतांचे दर्शन घेण्याची योग्य पद्धत, मोठ्यांचा आदर कसा करावा, तसेच नमस्कार करण्याची शास्त्रोक्त पद्धत, यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात आल्या. शिबिराच्या अंतिम दिवशी समारोप कार्यक्रम आणि बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित पालकांशी संवाद साधण्यात आला. सहभागी बालकांनीही अनुभव सांगून अशा शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले. बालकांचा, पालकांचा सहभाग : या पाच दिवसीय शिबिराला विद्यार्थ्यांची लाभलेली उपस्थिती उल्लेखनीय होती. जानोरकर मंगल कार्यालयातील शिबिरात ८० हून अधिक तर राजेश्वर कॉन्व्हेंटमधील शिबिरात १५० हून अधिक बालकांनी सहभाग नोंदवला. सनातन संस्कृतीची ओळख, सणांची माहिती व संस्कार मुलांवर नियमित व्हावे म्हणून सनातन संस्थेच्या वतीने सर्वांसाठी खुले व विनामूल्य साप्ताहिक संस्कार वर्ग जुने शहर परिसरात सुरू आहेत. ज्यांना शक्य होईल त्यांनी आपल्या पाल्यांना खालील वर्गात पाठवू शकता, असे कळवण्यात आले आहे. शिबिरामध्ये केवळ धार्मिकच नव्हे, तर मुलांच्या मनावर नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी बोधकथा सांगण्यात आल्या. तसेच कपाळावर टिळा लावण्याचे वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्त्व, आध्यात्मिक दृष्टीने केक न कापता भारतीय पद्धतीने वाढदिवस कसा साजरा करावा, ऋषीमुनींनी लावलेले शोध आणि देवांशी आत्मनिवेदन कसे करावे (संवाद कसा साधावा) याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध आध्यात्मिक खेळही घेण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा आणि अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःचे गुणसंवर्धन कसे करावे, याचेही विशेष तंत्र या शिबिरात शिकवण्यात आले.
Source link
पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























