Homeसांस्कृतिकVat Savitri Vrat 2025: वर्षातून दोनदा वट सावित्री व्रत का साजरा केला...

Vat Savitri Vrat 2025: वर्षातून दोनदा वट सावित्री व्रत का साजरा केला जातो? 27 मे की 10 जून नक्की कधी आहे वट पौर्णिमा?


व्हॅट सावित्री व्रत 2025:

सावित्री ब्रह्मा वडिनी सर्वदा प्रिया वाशिनी
म्हणून मला दु: खाच्या समुद्रापासून वाचवा
त्यांच्याबरोबर देव सावित्री म्हणून अविभाज्य
अविभाज्यता आणि जन्मामध्ये आपला जन्म होऊ द्या

विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत पाळतात. या दिवशी सावित्री आणि सत्यवानाच्या पूजेसोबतच वडाच्या झाडाचीही पूजा केली जाते. या व्रतामध्ये अशी आख्यायिका आहे की, सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला एक वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे, असं नारद मुनींनी तिला सांगितलं होतं. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केलं. तो लाकडे, फुलं, फळं आणण्याकरिता अरण्यात गेला असता. सावित्री त्याच्या बरोबर गेली. ते वानातील शोभा पहात पहात चालले होतं, पण सावित्रीने मन मात्र जागेवर नव्हतं. सत्यवानाने सर्व फळं गोळा केली, वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला, नंतर त्याला चक्कर यायला लागली आणि तो घाबरला. डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरं वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला.

इतक्या तिला समोरून एक दिव्य पुरुष येतांना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरणकरण्याकरिता टाकले. हे पाहून सावित्रीने त्या दिव्यपुरूषाच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्या दिव्यपुरूषाला नमस्कार केला आणि तिने विचारले की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो पुरूष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली.

हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतीसेवेवर मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला आणि चमत्कार झाला. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतीनिष्ठा आणि पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवलं.

वट सावित्री व्रत हा सण वर्षातून दोनदा का साजरा केला जातो?

देशाच्या वेगवेगळ्या भागात वट सावित्री व्रत वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जाते. पश्चिम भारतात हा व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळला जातो, तर उत्तर भारतात हा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरा करण्यात येतो. पण उपवास करण्याची पद्धत जवळजवळ सर्वत्र सारखीच आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या वट सावित्री व्रताला वट सावित्री पौर्णिमा असेही म्हणतात. नारद पुराणानुसार, वट सावित्री व्रत ज्येष्ठ अमावस्या किंवा ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाऊ शकते.

व्हॅट सावित्री अमावस्या 2025

वट सावित्री अमावस्या 26 मे 2025 रोजी आहे. अमावस्या तिथी 26 मे 2025 रोजी दुपारी 12.11 वाजेपासून 27 मे 2025 रोजी सकाळी 8.31 वाजेपर्यंत असणार आहे.

वट सावित्री पौर्णिमा 2025

यावर्षी वट सावित्री पौर्णिमा मंगळवार 10 जून 2025 रोजी आहे. पौर्णिमा तिथी 10 जून 2025 रोजी सकाळी 11.35 वाजेपासून दुपारी 01.13 वाजेपर्यंत असणार आहे.

वट सावित्री व्रत कुठे साजरे केले जाते?

अमावस्येला वट सावित्री व्रत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणामध्ये पाळले जाते. तर महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पौर्णिमेचा उपवास, सावित्री उपवास साजरा केला जातो.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!