Homeदेश-विदेशजम्मू काश्मीर पहलगम हल्ल्यात काय घडले ते भारत पाकिस्तान युद्ध तणाव यूएनएससी...

जम्मू काश्मीर पहलगम हल्ल्यात काय घडले ते भारत पाकिस्तान युद्ध तणाव यूएनएससी बंद सल्लामसलत


भारत पाकिस्तान तणाव: (Jammu Kashmir) जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावात आणखी भर पडली. सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन असो किंवा सीमाभागात दहशतवादी तळांमध्ये होणारा अन्नाचा किंवा पैशांचा पुरवठा असो. पाकिस्ताननं भारताला डिवचण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले. मात्र त्यांच्या याच कटकारस्थानांमुळं आता हेच वैर शेजारी राष्ट्राला भोवताना दिसत आहे.

भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Tensions) या दोन्ही राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती वाढत असतानाच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेनं एका बंद खोलीत उच्चस्तरिय बैठक घेतली. जिथं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या संवेदनशील परिस्थितीत संयमानं कोणतंही पाऊल उचलावं आणि चर्चेतून यावर तोडगा काढावा असं आवाहन सदस्य राष्ट्रांनी केलं.

5 मे 2025 रोजी पार पडलेल्या या बैठकीसंदर्भातील कोणतंही अधिकृत विधान UN च्या वतीनं जारी करण्यात आलेलं नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाचे मुद्दे जाहीर केले. भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर तोडगा काढत या परिस्थितीवर चर्चात्मक मार्गानं कोणती वाट काढता येईल आणि माहितीच्या देवाणघेवाणीनं कशा प्रकारे ही चर्चा अधिक सक्षम करता येईल यावर भर देण्यात आल्याचं ते म्हणाले. तर, ग्रीसच्या राजदूतांनी या बैठकीतून सकारात्मक परिणाम दिसून आल्याची माहिती दिली. आम्हाला हा तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रशियाच्या राजदूतांनी दिली.

भारतीय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली?

सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सह्यद अकबरुद्दीन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना या बैठकीतून किंवा चर्चेतून कोणताही तोडगा निघेल अशी आशा वाटत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तर, या बैठकीनंतर ते म्हणाले, ‘यापूर्वीप्रमाणेच आजही पाकिस्तानची अरेरावी इथं अपयशी ठरली. याआधी अपेक्षित असल्याप्रमाणेच परिषदेकडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतीय कूटनितीनं सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानच्या सर्वच प्रयत्नांना हाणून पाडलं’.

UN महासचिवांनीही केली पहलगाम हल्ल्याची निंदा

बंद खोलीत झालेल्या या पैठकीपूर्वीच संयुक्त राष्ट्र संघटनेते महासचिव एंटोनियो गुटरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या या तणावाला आतापर्यंतच्या गंभीर स्तराचा तणाव म्हणून संबोधत चिंता व्यक्त केली आणि या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली. नागरिकांना निशाण्यावर घेणं स्वीकारार्ह नसल्याचं त्यांनी परखड स्वरांत म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक...

0
फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,...

मंगळवारचे टॅरो राशीभविष्य:वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, सिंह राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

0
16 जून, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा प्रॉपर्टीशी...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

अभिजीत दिपके नागपूर निषेध अपडेट धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी

0
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या...
spot_img

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
error: Content is protected !!