Homeदेश-विदेशपाकिस्तानमध्ये लॉकडाउन? भारताकडून हल्ल्याच्या भीतीने मदरसे, हॉटेल आणि पर्यटकांसंदर्भात मोठा निर्णय

पाकिस्तानमध्ये लॉकडाउन? भारताकडून हल्ल्याच्या भीतीने मदरसे, हॉटेल आणि पर्यटकांसंदर्भात मोठा निर्णय


पाकिस्तान लॉकडाउन आणीबाणी : काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भयान शांतता पसरली आहे. भारताकडून पाकिस्तानवर संभाव लष्करी कारवाईची भीती असल्याने पाकिस्तानने  सुरक्षेच्या दृष्टीने पीओके प्रशासनाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदन देताना असे संकेत दिले की, जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊ शकते. या विधानानंतर संपूर्ण परिसरात अस्वस्थता आणि सतर्कता वाढली पाहिला मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये पीओके सरकारने नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. नीलम व्हॅली आणि लीपा व्हॅली सारख्या भागात कडक देखरेख वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मार्बल चेकपोस्टवरून अनेक पर्यटकांना परत पाठवले आहेत. तर स्थानिक रहिवाशांना नियंत्रण रेषेकडे जायला बंदी करण्यात आली आहे. तसंच, नागरिकांना सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे, पीओके प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धार्मिक मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून घोषित करून कारवाई करू शकतो अशी भीतीने पाकिस्तानने निर्णय घेतला आहे. पीओकेचे कायदा मंत्री मियां अब्दुल वाहिद यांनी भारतावर तीव्र हल्ला चढवत म्हटलं की, ते एका ‘धूर्त, निर्दयी आणि कट रचणाऱ्या’ शत्रूशी सामना करत आहेत आणि कोणत्याही प्राणघातक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच वेळी, भारताकडून संभाव्य आक्रमण झाल्यास सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी वाढवली आहे. पीओके सरकारने अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन निधीमध्ये 1 अब्ज रुपये हस्तांतरित केले आहेत. याशिवाय, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्नाच्या सभागृहांच्या मालकांनी सैन्याच्या समर्थनार्थ त्यांच्या आस्थापना तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्याच आवाहन केलं आहे.

त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाल्याचा पाहिला मिळत आहे. मे महिन्यात कराची आणि लाहोर हवाई क्षेत्रात दररोज आठ तासांसाठी (सकाळी 8 ते दुपारी 4) उड्डाणे बंद राहणार आहे. त्याचा परिणाम गिलगिट-बाल्टिस्तानपर्यंत पोहोचला आहे, जिथून इस्लामाबादला जाणारी उड्डाणे सलग दुसऱ्या दिवशी रद्द करावी लागली. गिलगिट आणि स्कार्दूला जाणाऱ्या विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. तसंच, इस्लामाबाद विमानतळावरील खराब हवामानामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे एकतर उशिराने झाली किंवा इतर विमानतळांवर वळवण्यात आली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भागवत म्हणाले- RSS गुप्त संघटना नाही, सरकारलाही माहीत आहे:100 वर्षांत कोणीही नोंदणी करण्यास सांगितले...

0
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावत म्हटले की, संघटना ना गुप्त आहे ना जनतेच्या नजरेपासून दूर काम करते. केरळमधील...

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!