Homeदेश-विदेशSC on Waqf : स्टे आणू नका म्हणत केंद्राने 7 दिवसांची मुदत...

SC on Waqf : स्टे आणू नका म्हणत केंद्राने 7 दिवसांची मुदत मागितली; तोपर्यंत परिस्थिती जैसे थे – सुप्रीम कोर्ट


वक्फ लॉ सुप्रीम कोर्टाची सुनावणी: नव्या वक्फ कायद्यासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत वापरकर्त्याकडून वक्फमध्ये कोणताही छेडछाड केली जाणार नाही किंवा मंडळात कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही. दरम्यान केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.

पहिल्या दिवसाच्या सुनावणीबद्दल बोलताना, कपिल सिब्बल यांनी वक्फ कायद्याविरुद्ध त्यांचे अनेक युक्तिवाद सादर केले होते. वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम लोकांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी असेही म्हटले की आपण आपला वारसा कोणाला सोपवायचा आणि तो कसा जपायचा हे राज्य कसे ठरवेल. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंसमोर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील 3 महत्त्वाचे मुद्दे

वक्फ बोर्डावर केंद्राचा प्रतिसाद येईपर्यंत वक्फ मालमत्तेची स्थिती बदलणार नाही.

न्यायालयाने वक्फ घोषित केलेली मालमत्ता रद्द केली जाणार नाही.

वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ परिषदेत नवीन नियुक्त्या होणार नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, 73 पैकी 5 याचिका सूचीबद्ध कराव्यात आणि सर्व युक्तिवाद त्यामध्ये समाविष्ट करावेत. आता कोणत्या पाच याचिका सूचीबद्ध करायच्या हे दोन्ही पक्षांनी ठरवायचे आहे. केंद्राने अलीकडेच वक्फ (सुधारणा) कायदा, 2025 अधिसूचित केला, ज्याला दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार चर्चेनंतर संसदेने मंजूर केल्यानंतर 5 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मान्यता मिळाली. राज्यसभेत 128 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं तर 95 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. तर लोकसभेत त्याच्या बाजूने 288 आणि विरोधात 232 मते पडली. अशाप्रकारे ते दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावरणीवर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “आम्हाला हा कायदा असंवैधानिक वाटतो. न्यायालयाने म्हटले आहे की केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ परिषद स्थापन केली जाणार नाही आणि ‘वापरकर्त्याद्वारे वक्फ’ हटवता येणार नाही. जेपीसी चर्चेदरम्यान, मी सरकारने प्रस्तावित केलेल्या सर्व सुधारणांना विरोध करणारा अहवाल दिला होता आणि विधेयकावरील चर्चेदरम्यान, मी विधेयक असंवैधानिक म्हटले होते. या कायद्याविरुद्ध आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील.”





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!