कात्रा श्रीनगर रेल्वे ट्रॅक: 28 वर्षांपासून सुरु असलेल्या भारतातील सर्वात थरारक रेल्वे मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या मार्गावर तब्बल 997 पूल आहेत. तसेच या रेल्वेमार्गावरील ट्रेन 119 KM लांब बोगद्यातून धावणार आहे. या प्रवासादरम्यान रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता बर्फाच्छदित डोंगर दऱ्या असे विहंगम निसर्ग सौंदर्य पहायला मिळेल. हा प्रवास म्हणजे स्वर्गानुभवापेक्षा कमी नसेल. विशेष म्हणजे या मार्गावरील 6 ते 7 तासांचा प्रवास फक्त 3 तासात पूर्ण होणार आहे.
कटरा-श्रीनगर रेल्वे असा हा रेल्वे मार्ग आहे. हे रेल्वे मार्ग उभारणे म्हणजे भारतीय रेल्वेसाठी मोठे चॅलेंज होते. हा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी रेल्वेला तब्बल 28 वर्षे लागली. 1197 मध्ये रेल्वेने हा प्रकल्प सुरू केल होता. हा रेल्वे मार्ग उभारताना अभियंत्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अखेर या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. 19 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रॅकवरील पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
जम्मू ते काश्मीर असा हा रेल्वे मार्ग असेल. या रेल्वे मार्गावर सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेन धावणार आहे. जम्मूमधील श्री माता वैष्णोदेवी कटरा स्टेशनपासून काश्मीरमधील श्रीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत धावेल. आतापर्यंत जम्मू ते श्रीनगर रेल्वे मार्ग नव्हता. या मर्गावर रस्त्याने प्रवास करण्यासाठी 6 ते 7 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. बर्फवृष्टी होते तेव्हा अनेक तास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मात्र, आता रेल्वे प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास जलद आणि सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही हवामानत प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही.
या रेल्वे मार्गावर 36 बोगदे असणार आहेत. या बोगद्यांचे एकूण अंतर सुमारे 119 किलोमीटर इतके आहे. एकूण 272 किलोमीटरचा हा रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजेच या मार्गावरील 40 टक्के रेल्वे प्रवास हा बोगद्यातून होणार आहे. या मर्गावर लहान-मोठे मिळून 979 पूल असमार आहेत. यापैकी चिनाब नदीवर बांधलेला पूल जगातील सर्वात उंच आहे. या पुलाची उंची 359 मीटर इतकी आहे. म्हणजे हा पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
































