Homeदेश-विदेश‘ती राहुलसोबत 5 दिवस राहिली, अन् नंतर घरी परतली...’ जावयासोबत पळून गेलेल्या...

‘ती राहुलसोबत 5 दिवस राहिली, अन् नंतर घरी परतली…’ जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या पतीचा धक्कादायक खुलासा


उत्तर प्रदेशातील जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या लव्ह स्टोरीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहे. सासूच्या नवऱ्याने तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सासूच्या नवऱ्याने सांगितलं की, पळून जाण्यापूर्वी ती राहुलच्या घरी 5 दिवस राहून घरी परत आली होती. तेव्हा सासू घरी एकटी आली होती. त्यावेळी सासूने नवऱ्याने सांगितलं की, माझ्या जावयाला बरं नाही, आजारी असल्याने त्याला भेटायला जात आहे. पण तेव्हा कोणीही विचार केला नव्हता. जेव्हा ती परत घरी आली तेव्हा ती परत दुसऱ्या दिवशी जावयासोबत पळून गेली.

सध्या दोघेही फरार असून हे दोघे कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याचे शेवटचे ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की, 1 मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की, ती तिचा भावी जावई राहुलच्या घरी जात आहे. कारण तो आजारी आहे. जितेंद्रला वाटले की त्याची पत्नी फक्त त्याची तब्येत विचारण्यासाठी येत आहे, पण वास्तव काही वेगळेच निघाले. ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली होती, असं नवऱ्याने सांगितलं.

पाच दिवसांनी ती महिला गावी परतली. तेव्हा राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला. त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही, पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून जाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. डेप्युटी एसपी महेश कुमार म्हणाले की, उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करणारा राहुल हे दोघांचे शेवटचे ठिकाण होते. मात्र पोलिसांना अद्याप त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. दोघांचेही फोन बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता स्थान शोधता येत नाही.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

हे प्रकरण मांद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावचे आहे. जितेंद्र कुमार यांचे कुटुंब येथे राहते. घरी बायको आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुलशी ठरले. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण लग्नाच्या नऊ दिवस आधी, वर त्याच्या होणार्या सासूसोबत पळून गेला.

जेव्हा वधूच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. वधूच्या वडिलांनी पत्नी आणि वर दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. कारण पत्नी घरात ठेवलेले 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेली आहे. पती जितेंद्र म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. मी तिच्यासाठी हुंड्याच्या वस्तू गोळा केल्या होत्या. माझ्या मुलीला जाताना देता यावे म्हणून मी घरी 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकडही ठेवली होती. पण मी घरी आल्यावर माझ्या पत्नीने असे काही केले की मला अजूनही विश्वास बसत नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!