उत्तर प्रदेशातील जावयासोबत पळून गेलेल्या सासूच्या लव्ह स्टोरीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहे. सासूच्या नवऱ्याने तिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. सासूच्या नवऱ्याने सांगितलं की, पळून जाण्यापूर्वी ती राहुलच्या घरी 5 दिवस राहून घरी परत आली होती. तेव्हा सासू घरी एकटी आली होती. त्यावेळी सासूने नवऱ्याने सांगितलं की, माझ्या जावयाला बरं नाही, आजारी असल्याने त्याला भेटायला जात आहे. पण तेव्हा कोणीही विचार केला नव्हता. जेव्हा ती परत घरी आली तेव्हा ती परत दुसऱ्या दिवशी जावयासोबत पळून गेली.
सध्या दोघेही फरार असून हे दोघे कुठे पळून गेले हे पोलिसांना अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याचे शेवटचे ठिकाण उत्तराखंडमधील रुद्रपूरजवळ सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिलेचा पती जितेंद्रने सांगितले की, 1 मार्च रोजी त्याच्या पत्नीने सांगितले की, ती तिचा भावी जावई राहुलच्या घरी जात आहे. कारण तो आजारी आहे. जितेंद्रला वाटले की त्याची पत्नी फक्त त्याची तब्येत विचारण्यासाठी येत आहे, पण वास्तव काही वेगळेच निघाले. ती पाच दिवस राहुलच्या घरी एकटीच राहिली होती, असं नवऱ्याने सांगितलं.
पाच दिवसांनी ती महिला गावी परतली. तेव्हा राहुलने त्या महिलेला गावातील प्राथमिक शाळेजवळ सोडले आणि नंतर निघून गेला. त्यावेळी कोणालाही काहीही संशय आला नाही, पण दुसऱ्या दिवशी दोघांनीही पळून जाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.
महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. डेप्युटी एसपी महेश कुमार म्हणाले की, उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करणारा राहुल हे दोघांचे शेवटचे ठिकाण होते. मात्र पोलिसांना अद्याप त्याला अटक करण्यात यश आलेले नाही. दोघांचेही फोन बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता स्थान शोधता येत नाही.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
हे प्रकरण मांद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावचे आहे. जितेंद्र कुमार यांचे कुटुंब येथे राहते. घरी बायको आणि मुलगी आहे. मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुलशी ठरले. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण लग्नाच्या नऊ दिवस आधी, वर त्याच्या होणार्या सासूसोबत पळून गेला.
जेव्हा वधूच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा त्यांना धक्का बसला. वधूच्या वडिलांनी पत्नी आणि वर दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. कारण पत्नी घरात ठेवलेले 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेली आहे. पती जितेंद्र म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न 16 एप्रिल रोजी होणार होते. मी तिच्यासाठी हुंड्याच्या वस्तू गोळा केल्या होत्या. माझ्या मुलीला जाताना देता यावे म्हणून मी घरी 5 लाख रुपयांचे दागिने आणि 3 लाख रुपयांची रोकडही ठेवली होती. पण मी घरी आल्यावर माझ्या पत्नीने असे काही केले की मला अजूनही विश्वास बसत नाही.

































