अक्षय कुमार: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘केसरी: चॅप्टर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान, एका पत्रकारानं अक्षयसमोर जया बच्चनविषयी वक्तव्य केलं. त्या पत्रकारानं जया बच्चन यांना त्याचा चित्रपट ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हे नाव आवडलं नाही आणि त्यामुळे त्या हा चित्रपट पाहणार नाहीत याविषयी सांगितलं. तर अक्षयनं यावर जे उत्तर दिलं त्यावर अक्षयनं नम्रतेनं उत्तर दिलं आणि सगळीकडे त्याची चर्चा रंगली आहे.
अक्षयनं या मुलाखतीत उत्तर देत सांगितलं की जर त्यांनी (जया) यांनी म्हटलं असेल तर ते योग्यच असेल. जर असा चित्रपट बनवून मी चूक केली असेल तर त्या जे बोलतायत ते योग्य आहे. ‘इंडिया टीवी कॉन्क्लेव’ मध्ये नुकत्याच त्याच्या उपस्थिती दरम्यान, जया बच्चन यांनी या चित्रपटाच्या नावावरून प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या चित्रपटाला फ्लॉप असल्याचं देखील म्हटलं होतं.
जया बच्चन तेव्हा म्हणाल्या होत्या की ‘फक्त चित्रपटाचं नाव बघा. मी तर अशा नावाचा चित्रपट कधीच नाही पाहणार. हे काही नाव आहे? असं कधी नाव असतं का?’ त्यानंतर जया बच्चन यांनी प्रेक्षकांकडे पाहिलं आणि विचारलं की ‘ते अशा टायटलचा चित्रपट पाहण्यासाठी तयाार आहेत?’ जेव्हा काही लोकांचेच हात वर पाहिले त्यानंतर त्या मस्करी करत म्हणाल्या, ‘इतक्या लोकांमधून फक्त चार लोकं आहेत जे हा चित्रपट पाहायला तयार आहेत. ही तर फार वाईट गोष्ट आहे. हा तर फ्लॉप आहे.’
जया बच्चनच्या प्रतिक्रियेवर लोकांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं की जया मॅमला 1 महिना अशा गावात सोडा जिथे अशी परिस्थिती आहे त्यानंतर विचारा. दुसरा नेटकरी म्हणाला, मग तर टॉयलेटमध्ये देखील या मॅडम जात नसतील. तर अनेक नेटकऱ्यांनी अक्षयनं दिलेल्या उत्तराची स्तुती केली आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, अक्षयनं काय हुशार व्यक्ती सारखं उत्तर दिलं आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला, अरे ही काहीही बोलते, तिला स्वत: ला माहित नसेल ती काय बोलते.
हेही वाचा : ‘नीट उभं राहता पण येत नाही!’ फुल नशेत संजय दत्तच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘केसरी चॅप्टर 2’ च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट रघु पालत आणि पुष्पा पालत यांचं पुस्तक ‘द केस दॅट शुक द एम्पायर’ वर आधारीत आहे. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारीत आहे. त्यावेळी काय झालं याच्या कधी न ऐकलेल्या गोष्टी आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वकील सी शंकरन नायर यांच्या नेत्तृत्वात झालेल्या लढाई संबंधीत आहे. हा चित्रपट 18 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

































