Homeमहाराष्ट्रजिल्ह्यात 61 गावांची तहान 86 टँकरवर‎:सिल्लोड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड तालुक्यात जलजीवनची...

जिल्ह्यात 61 गावांची तहान 86 टँकरवर‎:सिल्लोड, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड तालुक्यात जलजीवनची कामे कागदावरच‎

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचला असून, जलस्रोतांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६१ गावांत टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, या गावांना ८६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, जलजीवन मिशनची कामे रखडलेली असल्याने नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. पैठण तालुक्यात सध्या १६ गावांमध्ये २९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दररोज ५४ खेपा करण्यात येत आहेत. या टँकरद्वारे ५३ हजार ८०१ नागरिकांना दिलासा दिला जात असला तरीही अनेक गावात टँकरने शुद्ध पाणी पुरवठ्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. परिणामी, आडूळ भागातील अनेक तांडे, वस्तीवर ५ रुपयांना हंडाभर तर ५० रुपयांना बॅरेल भरून पाणी विकत घ्यावे लागत आहे, तर ब्राह्मणगाव तांडा येथील महिलांनी विहिरीवरील पाणी शेंदून घ्यावे लागत आहे. सध्या लासूरगाव, वाघोळी खुर्द, राजापूर पांगरी, बाळापूर, आडूळ बु., आष्टी, आंतरवाली तांडा, केकत जळगाव, चित्तेगाव तांडा, घोडेवाडी, आष्टीगाव तांडा, पिंपळगाव, पाडळी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. दरम्यान, वैजापूर तालुक्यात १९ विहिरींचे अधिग्रहण असून, नारंगी प्रकल्पात ४१.५३, बोर दहेगावमध्ये ४५.४३, कोल्हीत ३३.५४, बिलवणीत ३०.९१ टक्के तर सटाणा प्रकल्पात अवघा १५.५८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. खंडाळा प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. ^पैठण तालुक्यात ज्या गावांत टंचाई आहे तेथील ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी शुद्ध पाणी वितरीत केले जात असून, अनेक गावांत जल योजनेची कामे पूर्ण नसल्याने टँकरने पाणी देण्यात येत आहे. – राजेश कांबळे, पाणी पुरवठा अधिकारी पंचायत समिती, पैठण कन्नड | तीव्र उन्हामुळे तालुक्यातील जलसाठ्यांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. बहुतांश गावांत जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत. १५ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. तेथे १६ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार पंडित यांनी दिली. भांबरवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा आहे. जलजीवनची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी जि. प. सदस्य तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत यांनी केली. सिल्लोड | तालुक्यात २१ गावांना २८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. इतर १३ गावांच्या पाण्यासाठी १४ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. कोणत्याही गावाला पाण्याची टंचाई जाणवू देणार नाही असे सभापती अनिता बनकर यांनी सांगितले. २१ गावांना २८ टँकरद्वारे ५३ खेपा सुरू आहेत. १३ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. पैठण, वैजापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे करण्यात आली असून, ती अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही ६१ गावांतील नागरिकांनी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी तर अधिग्रहण असले तरी पाण्यासाठी शेतशिवारात भटकंती करावी लागत असल्याची स्थिती आहे. फुलंब्री | सध्या ६ गावांमध्ये ८ टँकर सुरू करण्यात आले आहेत, १५ गावांमध्ये १५ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. बिस्मिल्लाखा गावात २ टँकर, निधोना २, वावना १, मारसावळी १, धनशीवस्ती १, गेवराई गुंगी येथे १ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर १५ खासगी विहीर अधिग्रहण केलेल्या गावांमध्ये रेलगांव, मुर्शिदाबादवाडी, पिंपळगाव वळण, आडगाव खुर्द, कान्हेगाव, हिवरा आणि म्हसला या गावांचा समावेश आहे. तसेच टँकर सुरू असलेल्या बिस्मिल्लाखाँ गाव, वावना, मारसावळी, धनशीवस्ती, गवराई गुंगी येथे प्रत्येकी १ विहीर आणि निधोना गावासाठी ३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. १५ विहिरींपैकी ८ गावांत विहिरींचा गावासाठी तर ७ गावांत टँकर भरण्यासाठी वापर आहे. जलजीवनची कामे अपूर्ण ; पाण्यासाठी पायपीट सुरुच पंचायतीकडे प्रस्ताव आल्यानंतर टँकर सुरू कन्नडमध्ये जलस्रोत आटले; १५ गावांना तीव्र पाणीटंचाई फुलंब्री तालुक्यात ६ गावांना ८ टँकरने पाणीपुरवठा; १५ विहिरींचे अधिग्रहण



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!