Homeमहाराष्ट्रVarsha Gaikwad Protests at MHADA Office Over Dharavi Sector 5 Housing Delay...

Varsha Gaikwad Protests at MHADA Office Over Dharavi Sector 5 Housing Delay | धारावीकरांसाठी वर्षा गायकवाडांचा म्हाडा भवनावर मोर्चा: सेक्टर-5 मधील तयार घरांचा ताबा देत नसल्याने आंदोलन, 5 तास मांडला ठिय्या – Mumbai News

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील (डीआरपी) घरांचा ताबा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या धारावीकरांसह मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनातील दालनात ठिय्या दिला. डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची

?

धारावीतील सेक्टर 5 मध्ये म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या चार नव्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही या इमारतींचा ताबा पात्र रहिवाशांना देण्यात येत नसल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. यावरच संतप्त होऊन त्यांनी शताब्दी नगरमधील रहिवाशांसह थेट डीआरपीच्या कार्यालयात धडक दिली.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

डीआरपी कार्यालयात 5 तासांच्या आंदोलनानंतर, त्यांनी अखेर माघार घेतली. शताब्दी नगरमधील फ्लॅट्सचा ताबा मिळविण्यासाठी म्हाडा आणि डीआरपी यांच्यातील प्रलंबित कागदपत्रांच्या कामावर चर्चा करण्यासाठी 48 तासांच्या आत महत्त्वाची बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. जर 48 तासांच्या आत कोणताही तोडगा निघाला नाही, तर आम्ही आमचे आंदोलन पुन्हा सुरू करू. शताब्दी नगरातील रहिवाशांना त्यांची घरे मिळेपर्यंत आम्ही लढत राहू, असा इशाराही वर्षा गायकवाड यांनी दिला.

शताब्दी नगरमध्ये जे काही घडत आहे ते सर्व धारावीकरांसाठी धोक्याची घंटा आहे. जर त्यांना तयार घरांचा ताबा देण्यासाठी इतका वेळ लागला, तर धारावीकरांना विस्थापित केल्यानंतर ते घरे देतील याची काय हमी आहे? असा सवालही वर्षा गायकवाड यांनी केला. म्हणूनच आम्ही न्यायासाठी लढत राहू. सर्व धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

नेमके प्रकरण काय?

धारावी पुनर्विकासासाठी आधी सेक्टर 5 मध्ये स्वतंत्र प्रकल्प राबवण्यात येणार होता. याअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने पाच इमारतींचे काम हाती घेतले. त्यातील एका इमारतीत 358 घरांचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला. मात्र, उर्वरित चार इमारतींचे काम सुरू असतानाच राज्य सरकारने धोरण बदलत ‘एकत्रित पुनर्विकास’ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाप्रमाणे सेक्टर-५ चा पुनर्विकास मुंबई मंडळाकडून काढून घेण्यात आला. त्यानंतर एकत्रित पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रिया राबवून निविदा अंतिम करून अखेर धारावी पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला दिले.

तथापि, या निर्णयामुळे मुंबई मंडळाकडून सेक्टर 5 प्रकल्प तर काढून घेण्यात आला, पण चार अपूर्ण इमारती पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवण्यात आली. हे काम पूर्ण झालं असूनही इमारती डीआरपीकडे वर्ग करण्यात आलेल्या नाहीत.

खर्चाच्या रकमेवरून वाद मुंबई मंडळाने डीआरपीकडे इमारती हस्तांतरित करण्याआधी, त्यांच्या बांधकामाचा खर्च मिळावा, अशी अट घातली आहे. दुसरीकडे डीआरपीकडून या इमारतींचा ताबा मागितला जात आहे. या दोन्ही विभागांतील आर्थिक वादामुळे शताब्दी नगरमधील पात्र रहिवाशांचा ताबा रखडला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, सर्वजण एकत्र दिसतील:वडिंग म्हणाले- चन्नी, बाजवा, रंधावा आमचे वरिष्ठ; मुख्यमंत्रीपदाचा...

0
काँग्रेस हायकमांडने 2027 च्या विधानसभा निवडणुकांसाठी पंजाबमधील नेत्यांच्या भूमिका निश्चित केल्या आहेत. मात्र, यानंतर पक्षात गटबाजीच्या चर्चांनी जोर धरला. काही नेते प्रदेश काँग्रेस...

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!