मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत मूल्यमापनाचा निकाल जाहीर केला आहे. त्यात महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांचा पहिला क्रमांक आला आहे. यावरून शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री
?
लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आल्यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल त्या खात्यात पैसे खर्च करायचे नसतील तर खाते बंद केली तरी चालेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली होती. आज त्यांनी पुन्हा एकदा मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डवरून सरकारवर टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?
आदिती तटकरे यांच्या खात्यात आमच्या खात्याचा निधी वर्ग केला. त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे गेले. त्यानंतर त्यांचा विभाग नंबर एक वर आला. या कामगिरीत आमचा कुठेही उल्लेख नाही. कारण आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही. मग आमचा उल्लेख 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये कसा होणार? त्यामुळे हे खातेच बंद करून टाका, हे चांगले आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला. एकीकडे माझे पाय तोडायचे आणि दुसरीकडे मला म्हणायचे की, पळ…तर हे शक्य होणार नाही. हा माझ्यावर होत असलेला अन्याय आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदेंना भेटून आपबीती सांगणार
खात्याकडे निधी नसेल तर आम्ही नेमके काय काम करत आहे, हे जनतेला कसे कळणार? सरकारला कसे कळणार? असा सवालही शिरसाट यांनी केला. समाज कल्याण विभाग हे गोरगरीब जनतेला न्याय देणारे विभाग आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यांनी मोठ्या मनाने या विभागाला जास्तीत जास्त निधी द्यायला हवा. या खात्याचा निधी इतरत्र वर्ग करायला नको. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मी सगळे आपबीती सांगणार असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.
हे ही वाचा….
चंद्रशेखर बावनकुळेंचे निधी वळवण्याला समर्थन:म्हणाले – योजना चालवण्यासाठी थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वा चारशे कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वळवण्याला समर्थन दिले आहे. सामाजिक न्याय विभागात ज्या जाती आहेत, त्यांच्यात लाडकी बहिणी आहेत. यामुळे काही निधी आदिवासी विभागाचा, काही निधी सामाजिक न्याय विभागाचा, काही निधी महिला आणि बाल कल्याण विभागाचा असा थोडा थोडा निधी घेतला असेल तर काही हरकत नाही, असे बावनकुळे म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…
पक्ष बदलला, कलह तोच:मविआत असताना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप होता, महायुतीत असतानाही तेच सुरू
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार निधी देत नाहीत, असा आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारताना केला होता. आता सरकार बदलले तरीही निधीचा कलह कायम आहे. तशा तर एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशा कुरबुरी सुरूच होत्या. पण शनिवारी शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला. मला अंधारात ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचे पैसे वळवण्यात आले. असे त्यांनी सांगितले. पूर्ण बातमी वाचा…






























