अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 1 कोटी रुपये आणि चांदीची वीट संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 1 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदतीसह 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट हजारो शिवसैनिक आणि संत-महंतांच्या उपस्थितीत अर्पण केली होती. मात्र, वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या चांदीच्या विटीबाबत कोणतीही अधिकृत पावती किंवा माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. पूर्ण चौकशीची मागणी “ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली? तिचा वापर कशासाठी झाला? याची माहिती जनतेसमोर यायला हवी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राम मंदिर ट्रस्टकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर ट्रस्ट काय स्पष्टीकरण देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… अयोध्येत SIT ने विचारले- हार, चरण पादुका कोणाला दिले: महंत म्हणाले- टिन्नूला दिले; चांदीची वीट देणाऱ्या व्यापाऱ्याने सत्य सांगितले अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) आता अशा देणगीदारांशी संपर्क साधत आहे, ज्यांनी मंदिर ट्रस्टच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दागिने दिले होते. एसआयटी आपल्या अहवालात हे तथ्य समाविष्ट करेल की कधी आणि कोणाच्या हातात दागिने सोपवले गेले. कोणती पावती दिली होती की नाही. एसआयटीने गुरुवारी (18 जून) मुंबईतील एक व्यावसायिक अनिल विश्वकर्मा यांचे जबाब नोंदवले. व्यवसायिकाचा आरोप आहे, ‘आम्ही रामलल्लासाठी 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीच्या चरण पादुका टिन्नू यादव यांना दिल्या होत्या, पण मंदिराकडून कोणतीही पावती मिळाली नाही.’ सविस्तर वाचा
Source link
राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























