Pahalgam Terror Attack Updates Today : पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध नोंदवला जातो आहे. अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता. असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला कसा धडा शिकवता येईल? याबाबत उपाय योजण्याचं कामही सुरु आहे. या सगळ्या घडामोडी जाणून घ्या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
































