विदर्भात सूर्य कोपला असून सोमवारी (२१ एप्रिल) देशात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे कमाल ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी येथे ४५, अमरावती ४४.६ आणि अकोला येथे ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंदवण्यात आले. दरम्यान, मराठवाडा आ
?
गडचिरोली ४३, वर्धा ४३.४, यवतमाळ ४३.४, नागपूर ४३.६, वाशिम ४२.५, गोंदिया ४२.१ व बुलडाणा येथे ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहणार असून िवदर्भात उष्णतेची लाट राहील, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. उन्हाची तीव्रता पाहता नागपुरातील १३ चौकांतील सिग्नल दुपारी १ ते ४ या वेळेत रेड ब्लिंकवर ठेवले गेले. या वेळेत नागरिकांना या १३ चौकांत थांबावे लागणार नाही.
प्रमुख शहरांचे तापमान पुढीलप्रमाणे : छत्रपती संभाजीनगर ४०.९, नाशिक ३८.४, जळगाव ४२.० सोलापूर ४३.० , अहिल्यानगर, पुणे ४२.९.
विदर्भ, काेकणात पुन्हा ‘कमाल’ : विदर्भात पुढील तीन ते चार दिवस तापमान वाढ हाेईल. नंतर फारसा बदल हाेणार नाही.विदर्भात अकाेला, चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात २२ ते २५ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून येथे यलाे ॲलर्ट देण्यात आला आहे. शिवाय मंगळवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई तर २३ एप्रिल राेजी रत्नागिरी येथे तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान परभणी, बीड, हिंगाेली, नांदेड तसेच २४ व २५ एप्रिल राेजी साेलापूर, जालना, लातूर, धाराशिव, हिंगाेली येथे उष्ण व दमट हवामान रहाणार आहे. या जिल्ह्यांनाही यलाे ॲलर्ट देण्यात आलेला आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) राेजी साेलापूर, काेल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथे मेघगर्जानासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
































