Homeदेश-विदेशभारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोण जिंकेल? AI चे भाकीत ऐकून...

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर कोण जिंकेल? AI चे भाकीत ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य!


भारत पाकिस्तान अणु युद्ध: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनातील पाकिस्तानविरुद्धचा राग शिगेला पोहोचलाय. आता भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी प्रतिक्रिया अनेक भारतीय व्यक्त करतायत. पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले तर काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नाचे आर्टिफिशियल इंटेलिजेंसने दिलेले उत्तर आश्चर्यकारक आहे. सध्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपण एआयकडून घेतोय. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भातील प्रश्नही एआयलाच विचारण्यात आलाय. एआयने यावर काय उत्तर दिलंय, जाणून घेऊया.

भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धामुळे केवळ 2 देशांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा नाश होईल. यामध्ये कोट्यवधी लोकांचे प्राण जाऊ शकतात. हवामान व्यवस्था बिघडू शकते आणि संपूर्ण मानवजातीला धोका निर्माण होऊ शकतो, असं उत्तर एआयने दिलंय.

‘हे युद्ध कोणीही जिंकणार नाही’

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणते की, हे युद्ध कोणीही जिंकणार नाही. यात मानवता हरेल. कारण दोन्ही देश अणुशक्ती आहेत. भारत आणि पाकिस्तान दोघांकडेही सुमारे 170 ते 172 अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे शाहीन आणि घौरी सारखी क्षेपणास्त्रे आहेत. तर भारताकडे अग्नि-5 सारखी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ब्रह्मोससारखी अचूक क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत.

भारत जमीन, पाणी आणि आकाश या मार्गांनी अणुहल्ला करण्यास सक्षम आहे तर पाकिस्तान तांत्रिकदृष्ट्या मागे आहे. जर दोन्ही देशांनी एकमेकांवर 100 अणुबॉम्ब टाकले तरी सुमारे 2 कोटी लोक आपले प्राण गमावू शकतात. यासोबतच तापमानात घट झाल्यामुळे शेती उद्ध्वस्त होईल आणि संपूर्ण जगात अन्न संकट निर्माण होऊ शकते, असंही एआयने आपल्या उत्तरात म्हटलंय.

याचा परिणाम आशियापुरता मर्यादित नसेल

एका अहवालानुसार, या युद्धाचा परिणाम केवळ आशियापुरता मर्यादित राहणार नाही. तर तो जागतिक पातळीवर होईल. अणुयुद्धाचे दुष्परिणाम बराच काळ टिकतील. रेडिएशनमुळे कर्करोग, जन्मजात दोष आणि इतर आजार पसरतील. माती, हवा आणि पाणीदेखील विषारी होईल. कोट्यवधी लोक बेघर आणि उपाशी राहतील. जर भारत आणि पाकिस्तानमध्ये असे युद्ध झाले तर तो पराभव फक्त एका देशाचा नसून संपूर्ण मानवतेचा असेल, असेही या अहवलात म्हटलंय.

यावर तज्ञांचे काय मत आहे?

सध्या दोन्ही देशांतून एकमेकांविरुद्ध भडक विधाने केली जात आहेत. पाकिस्तानकडून खूप काही घडतय. तिथले नेते अधिक चिथावणीखोर भाषणं ठोकतायत. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा देश असू शकतो पण भारत हा एक जबाबदार आणि यशस्वी देश आहे. अशा परिस्थितीत पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना भारत नक्कीच धडा शिकवेल. असे असताना भारताकडून कधीही मानवतेचे उल्लंघन होणार नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. या भाकिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर AI हे एक कृत्रिम तंत्रज्ञान आहे. ते नेहमीच बरोबर किंवा नेहमीच चूक असेलच असे नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भागवत म्हणाले- RSS गुप्त संघटना नाही, सरकारलाही माहीत आहे:100 वर्षांत कोणीही नोंदणी करण्यास सांगितले...

0
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या नोंदणीची मागणी फेटाळून लावत म्हटले की, संघटना ना गुप्त आहे ना जनतेच्या नजरेपासून दूर काम करते. केरळमधील...

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!