?
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइन सतत फुटत असल्याने शहराला, दहा दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
जामखेड शहरासाठी भुतवडा तलावातून १९७२ ला पाणीपुरवठा योजना तयार झाली आणि ती १९७५ ला कार्यान्वित केली आहे. ही पाणीपुरवठा योजना तत्कालीन पाटबंधारे मंत्री स्व. आबासाहेब निंबाळकर यांनी मंजूर केली होती. तीही विना वीजपुरवठा नसलेली अशी योजना महाराष्ट्र कुठेही नाही. २०११ ला लोकसंख्या ३९ हजार ५५१ इतकी गृहीत धरून पाणी पुरवठा योजना केली होती. आता २०२५ ला लोकसंख्या अंदाजे ५० हजार इतकी झाली आहे. लोकसंख्या वाढली, पण पाणी पुरवठा योजना जुनीच आहे. त्यामुळे पाण्याचे रोटेशन बिघडत चालले आहे. ग्रामपंचायत काळातील पाइपलाइन असल्याने पाइपची मुदत संपली आहे. ही पाइप कंपनीही बंद झाल्या आहेत. मग पाइपलाइन फुटली तरी पाईप कुठुन आणणार हा प्रश्न गंभीर बनला आहे आणि पाइपलाइन कशी दुरुस्त करायची हा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या नवीन पाणीपुरवठा योजनांचे काम धिम्यागतीने सुरू आहे काम करतांना ठेकेदाराकडून अनेकवेळा जुनी पाईप लाईन फोडली आहे. त्यामुळे आठ दिवसांत चार वेळा पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे पाणी रोटेशन बिघडत आहे. शेतीचे कामे सुरू आहेत. दिवसेंदिवस गंभीर होत चालला जामखेड शहराचा पाणीप्रश्न काम करताना पाइप सतत फुटत असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ आले आहे. सध्या भुतवडा गावात अनेकदा पाइपलाइन फुटत आहे. दिवसेंदिवस शहराचा पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. याकडे लोकप्रतिनिधी व विविध पक्षांचे कार्यकर्ते यांचेही लक्ष नाही. सध्या नगरपरिषद प्रशासनाकडूनही लक्ष दिले जात नाही. निवडणुका नसल्याने पुढारी नगरपरिषदेकडे फिरकत देखील नाही,अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.































