Homeदेश-विदेशअत्यंत सुंदर! हरिवंश राय यांची कविता आणि अमिताभची स्वप्नातील राणी बेतिया; आता...

अत्यंत सुंदर! हरिवंश राय यांची कविता आणि अमिताभची स्वप्नातील राणी बेतिया; आता उघडणार तिचा खजिना

बिहारच्या तीन प्रमुख राजघराण्यांपैकी एक असलेल्या बेतिया राजची राणी जानकी कुंवर आज पुन्हा तिच्या मृत्यूच्या 71 वर्षांनंतर चर्चेत आली आहे. 1954 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे असलेल्या कोठीत राणी जानकी कुंवर यांचं निधन झालं. राणीच्या मृत्यूनंतर कोर्ट ऑफ वॉर्ड्सने केवळ त्यांची हवेली आणि जमिनीचा ताबा घेतला नाही तर  तिजोरीही काढून घेतली. ती तिजोरी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या त्रिवेणी शाखेत ठेवण्यात आली होती. आता बिहार महसूल परिषदेचे पथक प्रयागराजला पोहोचले असून बेतिया राणीच्या मालमत्तेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या तिजोरीत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असल्याचा म्हटलं जातं आहे.

राणीचा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेत उल्लेख

ही तिचं बेटिया राणीची आहे जिचा उल्लेख अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या अपूर्ण स्वप्न आणि निवारा पासून दूर या चित्रपटात केला आहे. तर ही बेतिया राणी कोण होती तर 1883 मध्ये बिहारमधील सर्वात मोठ्या राजघराण्यातील बेतिया राजाचे महाराजा राजेंद्र किशोर सिंह यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा हरेंद्र किशोर सिंहासनावर विराजमान झाला. महाराज हरेंद्र किशोर हे एक कुशल नेते आणि प्रशासक होते. ब्रिटिश सरकारनेही त्याची ताकद मान्य केली होती.

1884 मध्ये त्यांना महाराजा बहादूर ही पदवी देण्याचे हेच कारण होते. इतकंच नाही तर त्या काळात त्यांना बंगालचे लेफ्टनंट गव्हर्नर सर ऑगस्टस रिव्हर्स थॉम्पसन यांच्याकडून खिलाफत आणि सनद देखील देण्यात आली. त्यानंतर 1 मार्च 1889 रोजी त्यांना भारतीय साम्राज्याच्या सर्वात प्रतिष्ठित ऑर्डरचा नाईट कमांडर बनवण्यात आलं. एवढी प्रसिद्धी आणि कामगिरी असूनही, महाराजा हरेंद्र सिंह यांची सर्वात मोठी कमतरता म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. वडील जिवंत असताना त्यांनी शिव रत्न कुंवर हिच्याशी लग्न केलं पण ते वडील होऊ शकले नाहीत म्हणून काही दिवसांनी त्यांनी जानकी कुंवर हिच्याशी लग्न केले. यानंतरही त्यांना मुलं झालं नाही आणि अखेर 26 मार्च 1893३ रोजी बेतिया राजाचा कोणताही वारस न सोडता त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्युनंतर, महाराणी शिवरत्न कुंवर यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली, मात्र त्यांचेही 24 मार्च 1896 रोजी निधन झालं. अशा परिस्थितीत, त्यांची दुसरी राणी जानकी कुंवर संपूर्ण शाही मालमत्तेची वारस बनली. राणी जानकी कुंवर खूप सुंदर होती. राणीचे ओठ आणि गाल अतिशय सुंदर, तिचे डोळ्यांवरुन नजर हटत नव्हती. असं म्हटलं जातं की जेव्हा महाराजा हरेंद्र सिंह यांनी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्यांचं भान हरपलं होतं. हरिवंशराय बच्चन देखील बेतिया राणीच्या सौंदर्यावर अनेक कविता केल्या आहेत.

हे सर्व असूनही, त्यांच्याकडे राज्य कारभार हाताळण्याची क्षमता नव्हती. म्हणून ब्रिटिश राजवटीने त्याच्या राज्य मालमत्तेचा ताबा घेतला. यानंतर, महाराणी जानकी कुंवर बेतियाहून तत्कालीन अलाहाबाद, म्हणजेच आजच्या प्रयागराज इथे आल्या आणि येथे त्यांनी एक भव्य हवेली बांधली आणि तिथे राहू लागल्या. 27 नोव्हेंबर 1954 रोजी त्यांचे निधन झालं. त्यानंतर ही हवेली आणि त्यांची मालमत्ता कोर्ट ऑफ वॉर्ड्सने ताब्यात घेतली. सुमारे 22 बिघा जमिनीवर बांधलेला त्यांचा वाडा अजूनही येथे आहे, ज्याबद्दल हरिवंश राय बच्चन यांनी कवितेत उल्लेख केला आहे. ही हवेली सध्या सरकारच्या ताब्यात आहे.सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!