उद्धव ठाकरे गटाला मुंबईत अजून एक धक्का बसला आहे. मुंबईतील माजी नगरसेविका तथा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी ठाकरे गटाला शेवटचा जय महाराष्ट्र ठोकला आहे. गेली काही दिवस त्या नाराज होत्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी श
?
दरम्यान ठाकरे गटाने प्रवक्त्यांची यादी जाहीर केली यामध्ये त्यांना स्थान देण्यात आले नाही. अगदी शेवटच्या क्षणी त्यांचे नाव यादीत घेण्यात आले. यामुळे त्या नाराज होत्या. मी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पती-पत्नी मुंबई महापालिकेत नगरसेवक
संजय घाडी आणि संजना घाडी हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचा बोरिवली-मागाठणे परिसरातील चेहरे होते. आता, पती-पत्नींनी शिवसेना ठाकरे गटाचे शिवबंधन सोडत थेट एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही पती पत्नी हे मुंबई महापालिकेत नगरसेवक राहीले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते, माजी नगरसेवक राहिले होते. त्यात घाडी दाम्पत्याचा समावेश होता. शिंदे गटाविरोधात या दोघांनी आक्रमक भूमिका मांडत विविध मुद्यांवर आंदोलन केले होते.
ठाकरे गटाला मुंबईत मोठा धक्का
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजना घाडी यांचा प्रवेश झाला. त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजना घाडी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.






























