महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी यशस्वी कारकीर्द गाजवलेली आहे. एकही सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर 2024 नंतर या देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणली. 2014 पूर्वीची परिस्थिती जर आपण पाहिली तर विविध घोटाळे आपण पाहिले. परंतु मोदींच्या कार्यकाळात त्यांना एकही डाग लावण्याचे काम कोणी करू शकले नाही. राहुल गांधींनी एक वर्ष तरी देशात राहून दाखवावे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची परिस्थिती बिकट असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली होती. यावर विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी नेहमीच देशाच्या विरोधात आरोप लावत असतात. देशात असतात तेव्हा देखील आरोप करत असतात, देशाच्या बाहेर जातात तेव्हा देखील आरोप करतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये लढलेल्या सैनिकांच्या विरोधातही ते बोलतात. आता ते म्हणाले की पंतप्रधान मोदी एक वर्षानंतर पंतप्रधान नाही राहणार, मी तर म्हणतो, ते एक वर्षच नाही ते येणारे अनेक वर्षांपर्यंत या देशाचे नेतृत्व करतील. माझे एकच म्हणणे आहे राहुल गांधींना की तुम्ही एक वर्ष सातत्याने देशात तरी राहून दाखवा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंवर टोला इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी चेहरा घोषित करा. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, एनडीएकडे चेहरा आहे नरेंद्र मोदी. पण त्यांच्याकडे कोणता चेहरा आहे? त्यांच्यात एवढे मतभेद आहेत. इंडिया आघाडीमध्ये जे जातात ते पराभूत होतात. त्यामुळे ते सगळे इंडिया आघाडीमधून अनेक पक्ष बाहेर पडत आहेत. अजून एक कोणीतरी ऑनलाइन आले, फेसबुक लाईव्ह करायला आले, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. बच्चू कडूंच्या विधानवार काय म्हणाले शिंदे? बच्चू कडू यांनी म्हटले होते की एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बघा आता ही वेळ आहे का? आता काही जागा रिक्त आहे का? आहे का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे टीम म्हणून काम करत आहोत. आमच्यात चांगले बॉंडिंग आहे. हे बॉंडिंग कायम राहणार आहे. कार्यकर्त्यांची भावना असते, ते बोलून जातात. मी खुर्चीसाठी लढत नाही. आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे आहे. त्यामुळे आमच्यात चांगली बॉंडिंग आहे आणि जिथे कुठे आमच्या आमदार आणि खासदारांना जिथे कुठे त्रास असेल तिथे आम्ही आणि मुख्यमंत्री बसून चर्चा करू, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
Source link
PM नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली:टीका करणाऱ्या राहुल गांधींनी एक वर्ष तरी देशात राहून दाखवावे- एकनाथ शिंदे
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
ED ने मोठ्या सायबर फसवणुकीच्या नेटवर्कमध्ये कंबोडियातून कार्यरत 36,000 भारतीय सिमकार्डचा पर्दाफाश केला
मराठी बातम्याराष्ट्रीयED ने प्रमुख सायबर फसवणूक नेटवर्कमध्ये कंबोडियातून चालणारी 36,000 भारतीय सिम कार्ड उघड केलीनवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराअंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) कंबोडियातून चालवल्या...
स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:आपली शक्ती ओळखून आणि योग्य दिशेने काम करून आपण दुःख दूर...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; स्वतःची ताकद ओळखून आणि योग्य दिशेने काम केल्याने आपण दुःखावर मात करू...
पहिल्या वनडेमध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 86 धावांनी हरवले:21 वर्षांनंतर कंगारू संघावर दुसरा विजय; नावेद राणाने...
बांगलादेशने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार 86 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय इतिहासातील बांगलादेशचा हा केवळ दुसरा विजय...
नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा
नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची...
पहिल्या वनडेमध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 86 धावांनी हरवले:21 वर्षांनंतर कंगारू संघावर दुसरा विजय; नावेद राणाने...
बांगलादेशने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार 86 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय इतिहासातील बांगलादेशचा हा केवळ दुसरा विजय...
रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या देखील खेळणार आहेत....
आवाज बदल चेतावणी चिन्हे; मेंदूच्या फुफ्फुसातील व्होकल कॉर्ड रोग
9 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआपण आवाजाला केवळ संवादाचे माध्यम मानतो, पण तो आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा संकेत देखील आहे. सामान्यतः सर्दी-खोकला किंवा थकवा आल्यावर...
मैत्रिणीच्या अंत्यसंस्कारात रडला सलमान खान:आधार घेऊन स्मशानभूमीत बाहेर पडला, सोहेल खान हेलनला सांभाळताना दिसला;...
अभिनेता सलमान खान मंगळवारी कुटुंबासोबत त्यांची कौटुंबिक मैत्रिण कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले. यावेळी सलमानचे भाऊ सोहेल, अरबाज आणि त्यांची आई सलमा खान...





























