Homeदेश-विदेशकेरळ कोझिकोडमध्ये अमीबिक एन्सेफलायटीसचा मृत्यू 9 वर्षांचा आहे

केरळ कोझिकोडमध्ये अमीबिक एन्सेफलायटीसचा मृत्यू 9 वर्षांचा आहे


अमीबिक एन्सेफलायटीस मृत्यू: केरळमधून एक हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोझिकोड जिल्ह्यात केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. अमिबा नाकातून शरीरात शिरला आणि थेट मेंदूवर आघात करत झपाट्याने संक्रमण पसरलं. परिणामी उपचारादरम्यानच चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.

हा आजार कशामुळे होतो?

तापाच्या साध्या लक्षणांनी सुरुवात झालेला हा आजार इतका भीषण ठरला की केवळ एका दिवसात तिची प्रकृती ढासळली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा आजार दूषित गोड्या पाण्यात आढळणाऱ्या नेगलेरिया फाउलेरी अमिबामुळे होतो. अमिबा नाकावाटे शरीरात शिरून थेट मेंदूवर हल्ला करतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करत जातो, असं आरोग्य विभागाने सांगितलं.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संक्रमण झपाट्याने पसरतं त्यामुळे वेळेत उपचार करणं अवघडं होतं असल्यानेच मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.”

वर्षभरात चौथा मृत्यू

कोझिकोडमध्ये एका वर्षात या आजारामुळे चौथा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण आहे. आरोग्य विभागाने तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, नागरिकांना दूषित पाण्यात अंघोळ टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

खबरदारी घ्या

“दुर्मिळ असला तरी हा आजार जीवघेणा आहे. त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घेणं आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं हीच काळाची गरज आहे,” असं डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणालेत.

FAQ

अमीबिक इंसेफेलायटिस म्हणजे काय?
अमीबिक इंसेफेलायटिस, ज्याला प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलायटिस (PAM) असेही म्हणतात, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक मेंदूचा संसर्ग आहे. हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या मुक्त-जिवंत अमीबामुळे होतो, जो दूषित गोड्या पाण्यात (उदा., तलाव, नद्या, विहिरी) आढळतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतो.

या आजाराची लक्षणे कोणती आहेत?
अमीबिक इंसेफेलायटिसची लक्षणे दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर 1 ते 12 दिवसांत दिसू लागतात, यामध्ये खालील समाविष्ट आहे:  डोकेदुखी
> हीटिंग
>मळमळ आणि उलटी
> फील्डरलिली
>गंध आणि चव यातील बदल
>गोंधळ, भ्रम, दौरे, संतुलन बिघडणे आणि कोमा
>हा आजार झपाट्याने पसरतो आणि लक्षणे सुरू झालyanंतर 5 ते 18 दिवसांत मृत्यू होऊ शकतो.

या मुलीच्या मृत्यूचे कारण काय होते?
9 वर्षीय मुलीला 13 ऑगस्ट 2025 रोजी ताप आल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती झपाट्याने खालावल्याने 14 ऑगस्ट रोजी तिला कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर 15 ऑगस्ट रोजी मृत्यूचे कारण अमीबिक इंसेफेलायटिस असल्याचे निश्चित झाले.

हा आजार कसा होतो?
हा आजार नेगलेरिया फाउलेरी अमीबामुळे होतो, जो दूषित गोड्या पाण्यात (उदा., तलाव, नद्या, गरम झरे, अक्लोरीनेटेड पाणी) आढळतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो, विशेषत: पोहणे, डुबकी मारणे किंवा दूषित पाण्यात अंघोळ करताना. त्यानंतर तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तीव्र जळजळ आणि मेंदूच्या पेशींचा नाश करतो. हा आजार माणसापासून माणसाला पसरत नाही.

कोझिकोडमध्ये या आजाराचे किती रुग्ण आढळले आहेत?
2025 मध्ये कोझिकोड जिल्ह्यात अमीबिक इंसेफेलायटिसचे हे चौथे प्रकरण आहे. यापूर्वी, मे 2024 मध्ये एका 5 वर्षीय मुलीचा, जून 2024 मध्ये एका 13 वर्षीय मुलीचा आणि जुलै 2024 मध्ये एका 14 वर्षीय मुलाचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.

या आजाराचा मृत्यूदर किती आहे?
अमीबिक इंसेफेलायटिस हा अत्यंत दुर्मिळ परंतु प्राणघातक आजार आहे, ज्याचा मृत्यूदर 90% पेक्षा जास्त आहे, अगदी उपचार घेतल्यानंतरही. जगभरात फक्त काही रुग्णच यातून वाचले आहेत. केरळमध्ये 2024 मध्ये 19 रुग्णांपैकी 14 जण वाचले, जे लवकर निदान आणि उपचारामुळे शक्य झाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला:यामुळे उत्तर भारतात 1 ते 4...

0
मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत 26 राज्यांना व्यापले आहे. यापूर्वी 24 जून रोजी...

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!