Pakistan Independence Day 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला भारतानं चांगलाच धडा शिकवला. मात्र ही शिकवण मिळूनही पाकिस्तान सुधारलेला नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सततचं खोटं बोलणं असो किंवा भारताचा दूषणं लावणं असो, पाकिस्तानच्या या भूमिका जैसे थे असल्याचच पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून, पाकसोबकच्या संघर्षासाठी भारतच जबाबदार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे. तर, देशाच्या राष्ट्रपतीपदी असणाऱ्या आसिफ अली जरदारी यांनीसुद्धा असंच वक्तव्य करत काश्मीर मुद्द्याचा उल्लेख केला आणि सर्वांचच लक्ष त्यांच्याकडे वळलं.
भारतानं जे केलं ते….
‘रेडिओ पाकिस्तान’च्या वृत्तानुसार ‘भारतानं आक्रमण करत मोठी चूक केली मात्र पाकिस्ताननं मोठ्या धाडसानं या संकटसमयी उत्तर दिलं. सारं जग हे जाणून आहे की, आमच्या देशाला शांतता हवीय. मात्र आम्ही देशाच्या अखंडतेचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत. कोणाच्याही आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापुढं आम्ही झुकलो नाही आणि झुकणारही नाही’, असं जरदारी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मिळालेला फटका जरदारी यांनी यावेळीसुद्धा स्वीकारला नाही. उलटपक्षी ‘भारतासोबतच्या संघर्षामध्ये मिळालेल्या विजयामुळं आम्हीच एकजुट असल्याची आठवण झाली’, असं ते म्हणाले.
काश्मीर मुद्द्यावरून ओकली गरळ…
काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना पाकिस्तान कायमच तुम्हाला साथ देईल असं म्हणत जरदारी यांनी अनेक नजरा वळवल्या. ‘आम्ही सर्वजण काश्मीरसोबत आहोत. न्यायासाठी त्यांचं साहस आणि त्यांचा संघर्ष आमच्या मनाच्या जवळचा आहे. पाकिस्तानकडून तोपर्यंत ही कूटनिती, नैतिक आणि राजकीय समर्थन दिलं जाईल जोपर्यंत आत्मनिर्णयासह त्यांना अधिकार दिले जात नाहीत’, असं म्हणत त्यांनी आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्याचं म्हणत भारतावर टीका करणं सुरूच ठेवलं.
FAQ
ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय घडलं?
ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सैन्याने 6-7 मे 2025 रोजी राबवलेली कारवाई होती, जी 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला (26 नागरिकांचा मृत्यू) प्रत्युत्तराखातर करण्यात आली होती.
शाहबाज शरीफ यांनी काय वक्तव्य केलं?
शाहबाज शरीफ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या संदेशात दावा केला की, ‘मार्का-ए-हक’ (पाकिस्तानची प्रतिकार कारवाई) मुळे भारताने लादलेल्या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानला ‘ऐतिहासिक विजय’ मिळाला. त्यांनी पाकिस्तानी सैन्याने ‘शत्रूला गुडघे टेकायला लावलं’ असा दावा केला आणि दोन राष्ट्र सिद्धांताला (Two-Nation Theory) पाठिंबा देत भारतावर टीका केली.
आसिफ अली झरदारी यांनी काय म्हटलं?
काश्मीर मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, पाकिस्तान काश्मिरींना ‘न्याय आणि आत्मनिर्णयासाठी’ कूटनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देईल. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील नुकसान नाकारत पाकिस्तानच्या ‘विजया’वर जोर दिला.






























