Homeदेश-विदेशGoogle ची सर्वात गंभीर चूक, भूकंपाआधी 1 कोटींहून अधिक लोकांना नाही मिळाली...

Google ची सर्वात गंभीर चूक, भूकंपाआधी 1 कोटींहून अधिक लोकांना नाही मिळाली वॉर्निंग, काय झाला परिणाम?


Google भूकंप चेतावणी: 6 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी तुर्कस्तानात 7.8 रिश्टर तीव्रतेचा भयंकर भूकंप झाला. गुगलची अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट (AEA) प्रणाली कार्यरत असतानाही, सुमारे 1 कोटी लोकांना वेळेवर इशारा मिळाला नाही. केवळ 469 लोकांना “अॅक्शन घ्या” हा हाय अलर्ट मिळाला. तर 5 लाख लोकांना “सावध रहा” हा सौम्य इशारा पाठवला गेला. या इशाऱ्यामुळे फोनचा ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड देखील सक्रिय झाला नाही. ही तीच प्रणाली आहे, जी गुगलने 100 हून अधिक देशांमध्ये “जागतिक सुरक्षा जाळे” म्हणून कार्यान्वित केलीय. इथे राष्ट्रीय इशारा यंत्रणा कार्यान्वित नाही. गुगलची भूकंप इशारा प्रणाली कशी कार्य करते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

गुगलची AEA प्रणाली अँड्रॉइड फोनमधील सेन्सर्सद्वारे भूकंपाच्या लाटांचा शोध घेते. भूकंपाच्या लाटा हळूहळू पसरत असल्याने, काही सेकंद आधीच इशारा देणे शक्य होते. “अॅक्शन घ्या” हा गंभीर अलर्ट येतो आणि फोनवर मोठा अलार्म वाजवतो. यानंतर स्क्रीन लॉक होते आणि ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडही निष्क्रिय होतो. दुसरा “सावध रहा” अलर्ट सौम्य धक्क्यांबाबत माहिती देतो. पण फोन सुरु राहत नाही. तुर्कीमध्ये प्रणालीने भूकंपाची तीव्रता 4.5 ते 4.9 एमएमएस असल्याचा चुकीचा अंदाज लावला. ज्यामुळे ‘अॅक्शन घ्या’ हा महत्त्वाचा इशारा बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचलाच नाही.

गुगलने काय दिले स्पष्टीकरण?

त्याच दिवशी दुसऱ्या मोठ्या भूकंपातही प्रणालीने तीव्रता कमी लेखली. फक्त 8 हजार 158 लोकांना “अॅक्शन घ्या” आणि 40 लाख लोकांना “सावध रहा” असा अलर्ट मिळाला. यानंतर गुगलची यंत्रणा कामाला लागली आणि त्यावर संशोधन करण्यात आले. यानंतर गुगलने यावर खुलासा केला.
जर अल्गोरिदम सुधारला असता, तर 1 कोटी लोकांना “कृती करा” आणि 6.7 कोटी लोकांना “सावध रहा” अलर्ट मिळू शकले असते, असा खुलासा गुगलने केला. “प्रत्येक मोठा भूकंप आमच्या प्रणालीच्या मर्यादा दाखवतो, आणि आम्ही त्यातून शिकून सुधारणा करत आहोत, असे गुगलने बीबीसीला सांगितले.

शास्त्रज्ञांनी काय उपस्थित केले प्रश्न?

या अपयशाची माहिती उघड करण्यासाठी गुगलला दोन वर्षे लागली, ही बाब चिंताजनक आहे. “एवढ्या मोठ्या आपत्तीत जिथे हजारो लोकांचा मृत्यू झाला, तिथे यंत्रणेच्या अपयशाची माहिती इतक्या उशिरा समजली हे अत्यंत निराशाजनक असल्याचे  कोलोरॅडो स्कूल ऑफ माइन्सच्या प्राध्यापक एलिझाबेथ रेड्डी म्हणाल्या.

गुगलवर पूर्ण अवलंबून राहणे योग्य आहे का?

आमची प्रणाली राष्ट्रीय इशारा यंत्रणेची जागा घेणारी नसून पूरक आहे, असे गुगलने म्हटलंय. असे असताना काही देश यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकतात. सध्या 98 देशांमध्ये AEA प्रणाली कार्यरत असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...

ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा

0
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

0
जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून...
spot_img

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
error: Content is protected !!