Homeदेश-विदेशशंकराचार्य यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असा अंदाज वर्तविला आहे

शंकराचार्य यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असा अंदाज वर्तविला आहे


नरेंद्र मोदी सेवानिवृत्ती: सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली याचा अर्थ थांबायला हवं असं सांगत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्तीचा सल्ला दिल्याचा दावा केला जात आहे. मोहन भागवत यांच्या विधानानंतर आता नरेंद्र मोदींच्या निवृत्तीची चर्चा रंगलेली असताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये राजीनामा देतील असं भाकीत ‘झी 24 तास’शी बोलताना वर्तवलं आहे.

मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, “हीच तर समस्या आहे. बोलतातही आणि नंतर अंदाज लावण्यासाठी सोडून देतात. जर आहे तर स्पष्ट सांगितलं पाहिजे”.

पुढे त्यांना सांगितलं की, “सरकारी कार्यालयांमध्ये निवृत्तीसाठी 65 तर काही ठिकाणी 60 वयाची अट आहे. नरेंद्र मोदींनी सत्तेत आल्यानंतर राजकारणातून निवृत्त होण्यासाठी 75 वय असावं अशी अटक स्वत: त्यांनी तयार केली. या नियमाचा प्रभाव अनेक ज्येष्ठ नेत्यांवर पडला आणि त्यांना निवृत्त केलं गेलं. त्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्यात आलं. नियम तयार करताना आपणही 75 वर्षांचे होऊ याची कल्पना होती. तरीही त्यांनी तो नियम बनवला. अर्थात त्यांची 75 वर्षं पूर्ण झाल्यानंतर ते आपला नियम तोडणार नाहीत. आम्हाला वाटतं की, सप्टेंबरमध्ये किंवा एक दोन महिने पुढे मागे नियमाचा आदर करत राजीनामा देतील”. नियमांचं पालन करुन त्यांनी आदर्श पाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=VBVA9ISF94K

मोहन भागवत काय म्हणाले?

75 वर्षांची शाल ओढली जाते, तेव्हा त्याचा अर्थ तुमचं वय झालं आहे, आता बाजूला व्हा आणि आम्हाला करु द्या असं विधान मोरोपंत पिंगळे यांनी केल्याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली. साप्ताहिक विवेक निर्मित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे – द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक . मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

‘ठाकरे बंधू एकत्र राहणार नाहीत’

ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर शंकराचार्यांनी शंका व्यक्त केली आहे. दोघांचे स्वभाव; शैली भिन्न आहेत. एकत्र आले तरी सोबत राहतील असं वाटत नाही असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले आहेत. राज ठाकरे स्ट्रेट फॉरवर्ड, हिंदुत्ववादी हार्ड लाईन घेणारे आणि उद्धव ठाकरे सर्वसावेशकतेचं राजकारण करणारे त्यामुळे हे दोघे एकत्र राहतील की नाही याबाबत शंका आहे. मात्र दोघांनी राजकीय मुद्द्यांचा एक फॉर्म्युला नक्की करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दोन्ही ठाकरे आता एकत्र आले असतील तर एकत्रच राहीले पाहिजे; विभक्त झाले तर लोकांना वाईट वाटेल. महाराष्ट्राला यांच्या एकत्र येण्यानं आनंद झाला आहे असं त्यांनी सांगितलं

ठाकरे मूळचे मगधचे आहेत. महाराष्ट्रातील नाही, त्यांना मागधी भाषा येतेय का? त्यांनी मागधीत बोलुन दाखवावं असंही आव्हान त्यांनी दिलं. भाषीक अस्मितेवर चालणारं राजकारण फारसं यशस्वी होणीर नाही; फारसं चालणार नाही. हिंदी असो किंवा मराठी कोणतीही भाषा थोपता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

तामिळनाडूत हिंदीला सर्वाधिक विरोध झाला मात्र आता विरोध झाल्यामुळेच तामिळनाडूत सर्वांना हिंदी येते. जर राज ठाकरेंना वाटत असेल प्रत्येकाला मराठी यावं तर त्यात चूक नाही मात्र त्यासाठी मारहाण चुकीची असंही त्यांनी सांगितलं. मी दोन महिने मुंबईत आहे. मलाही मराठी शिकायचं आहे. मला ज्ञानेश्वरी मूळ भाषेत वाचायची आहे अशी इच्छा यावेळी त्यांनी बोलून दाखवली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!