राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच एकत्र तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, श्री बालाजीच्या या दर्शनासाठी या दोन्ही नेत्यांनी तब्बल 11 किलोमीटरची पायपीट केल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या तिरुपती वारीमुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतेच तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यासाठी या नेत्यांनी तिरुपती ते तिरुमला डोंगरापर्यंत तब्बल 11 किलोमीटरचा पायी प्रवास केला. या भक्तीपूर्ण प्रवासाचे आणि देवदर्शनाचे ‘एक्सक्लुझिव्ह’ फोटो तसेच व्हिडिओ एका वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहेत. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही नेत्यांची नावे आघाडीवर असल्याने त्यांच्या या विशेष देवदर्शनाला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी रात्री सुरू झालेल्या या पायी प्रवासानंतर आज सकाळी सर्वांनी श्री बालाजीचे मनोभावे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे, ॲड. निलेश देशमुख, चंद्रहार पाटील आणि ओमराजे यांचे बंधू हेदेखील उपस्थित होते. बालाजीच्या दर्शनानंतर या सर्व नेत्यांनी विजयवाडा येथे जाऊन कन्यका देवीचेही दर्शन घेत तिला साकडे घातले. या संपूर्ण देवदर्शनासाठी या सर्व खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि त्यानंतर विजयवाडा असा प्रदीर्घ प्रवास केला. पैलवान चंद्रहार पाटील यांनी काही खास फोटो शेअर करत या भक्तीपूर्ण प्रवासाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह त्यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. या सर्व नेत्यांनी रात्री 10 ते पहाटे 2.30 या वेळेत तब्बल 3800 पायऱ्या चढून जवळपास 11 किलोमीटरचे अंतर पायी पार केले आणि पहाटेच्या सुमारास श्री बालाजीचे मनोभावे दर्शन घेतले.
Source link
संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























