पप्पू यादव चॅलेंज: महाराष्ट्रात मराठी भाषेवरून सुरू असलेल्या वादाचा परिणाम आता बिहारमध्येही दिसू लागलाय. पूर्णियाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याबद्दल राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. ‘राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करतायत. मी राज ठाकरेंना आव्हान देतोय, त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार बाहेर काढेन!’ असे पप्पू यादवांनी म्हटलंय.
‘आज पत्रकार परिषदेत मी उद्धव ठाकरे यांचे नाव चुकून घेतले. मी त्यांचा मनापासून आदर करतो. भाजपच्या इशाऱ्यावर राज ठाकरे जी गुंडगिरी करत आहेत, ती मी चालू देणार नाही! प्रत्येक राज्याच्या प्रादेशिकतेचा आदर करायला हवा. पण जर त्यांनी आमच्या बिहारमधील लोकांवर त्याच्या नावाने हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही, असेही ते म्हणाले.
नितेश राणेंची टीका
मराठी न बोलल्याबद्दल एका हिंदू व्यक्तीला मारहाण केल्याचे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली. ‘टोपी घातलेले’ लोक मराठी चांगले बोलतात का? असा प्रश्नही उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मुंबईच्या बाहेरील भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलच तापलंय.
महाराष्ट्रातील हिंदी वक्तांवर राज ठाकरे
लोक हल्ला करीत आहेत, मी ते राज ठाकरे
आव्हान दिले, तो हा गुंडगिरी थांबवितो
अन्यथा मी मुंबई आणि त्याच्या सर्व हातकडीला आलो
काढेल!आज पत्रकार परिषदेत उधव ठाकरे चुकून
मी मनाने त्याचा आदर करतो असे नाव घेतले आहे
करत आहे…– पप्पू यादव (@pappuyadavjap) 4 जुलै, 2025
केडियांचे आव्हान, माफी आणि आणखी एक ट्वीट!
मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या मीरा रोड येथील दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?”. असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान दिले. यानंतर त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली. दरम्यान त्यांनी आणखी एक ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. तोपर्यंत निश्चिंत राहा. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन केला जाणार नाही. न्याय व्यवस्था संपूर्ण सक्रीय राहील. विश्वास हाच प्रेमाचा आधार आहे. प्रेम न्यायाचा आणि न्याय धर्माचा आधार आहे. जय महाराष्ट्र, जय भारत! असे सुशील केडीयांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.































