सोनाली बेंद्रे सह-स्टार आत्महत्या: चित्रपटसृष्टी म्हटलं की सगळ्यांना आलिशान आयुष्य असतं असं वाटतं. मात्र, खरंतर सेलिब्रिटी हे त्यांच्या खासगी आयुष्याला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. तर कधी त्यांच्या आयुष्यात असं काही होतं की ते आत्महत्या करतात. त्यात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा एक सह कलाकार आहे. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण अभिनय क्षेत्रात तो त्याचं स्थान मिळवू शकला नाही आणि त्यानं देखील आत्महत्या केली.
आज आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय तो कोणी दुसरा नाही तर सोनाली बेंद्रेसोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता कुणाल सिंह आहे. 90 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीला प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्याचं अचानक निधन झालं आणि त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानं आत्महत्या केली पण असं असली तरी त्यानं कोणतीही चिठ्ठीही लिहिली नव्हती. त्याच्या वडिलांचा दावा होता की त्याची हत्या करण्यात आली.
हरियाणामध्ये कर्नल राजेंद्र सिंग यांच्या घरी कुणाल सिंगचा जन्म झाला. तमिळ चित्रपटातून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यासोबत 1999 मध्ये कुणालनं सोनाली बेंद्रेसोबत रोमॅन्टिक चित्रपट ‘कधलार धिनम’ मध्ये काम केलं. त्यानंतर हाच चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि त्याचं नाव ‘दिल ही दिल में’ चित्रपटाचं एक गाणं ‘ऐ नाजनीन सुनो ना’ तर आज देखील तुम्ही हे विसरू शकला नसाल. आज देखील त्याचं हे गाणं कल्ट आहे.
कुणालनं सोनाली बेंद्रेसोबत ‘दिल ही दिल में’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. आपल्या करिअरमध्ये त्यानं फ्लॉप पण जवळपास 16 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जेव्हा एक अभिनेता म्हणून त्याला कमी काम मिळू लागलं. तर त्यानं अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट एडिटर म्हणून काम केलं आणि चित्रपट निर्मितीचं देखील काम केलं. त्याचा अखेरचा चित्रपट हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला Nanbanin Kadhali आहे. इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतरही तो त्याचं चित्रपटसृष्टीतील स्थान मिळवू शकला नाही.
हेही वाचा : पोटच्या बाळाला कुशीतही घेऊ शकत नाही अशी अवस्था, लोकप्रिय अभिनेत्रीला जडलाय दुर्मिळ आजार!
कुणालचे वडील राजेंद्र सिंग यांनी मुलाच्या मृत्यूनंतर दावा केला होता की त्याच्या शरिरावर जखमांचे निशाण होते. अभिनेत्री लवीना भाटियाला कुणालच्या निधनाच्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची बराचकाळ चौकशी करण्यात आली कारण ज्यावेळी हे सगळं घडलं तेव्हा ती बाथरूममध्ये होती. पण तिच्या विरोधात कोणताही पुरावा समोर आला नाही आणि तिची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील तपास करण्याची जबाबदारी ही सीबीआयला देण्यात आली होती आणि हे कळलं की हे आत्महत्येचं प्रकरण होतं. या प्रकरणाला पाहिल्यानंतर आज लोकांना सुशांत सिंगची आठवण होते.
































