Homeदेश-विदेशजैसलमेर जोधपूर महामार्गावर बस कॅचने आग लावल्यानंतर 19 ठार

जैसलमेर जोधपूर महामार्गावर बस कॅचने आग लावल्यानंतर 19 ठार


खासगी बसला आग लागून 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे. मंगळवारी जैसलमेरहून राजस्थानमधील जोधपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. यानंतर बसमधील 19 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 प्रवाशांना घेऊन बस दुपारी 3 वाजता जैसलमेरहून निघाली. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर बसच्या मागच्या भागातून धूर येऊ लागला. यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. परंतु काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली.

पसंतीचा स्त्रोत म्हणून झी न्यूज जोडा

स्थानिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्यात मोठी भूमिका पार पाडली. यादरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी प्रवाशांना जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

जैसलमेर जिल्हा प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत.

राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि इतर नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जखमींना योग्य वैद्यकीय उपचार आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

“जैसलमेरमध्ये बसला आग लागल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद अपघातात बाधित झालेल्यांप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं आहे.

मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर घटनेवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “राजस्थानातील जैसलमेर येथे अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दु:खी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.” पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

0
लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद...

TMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC पश्चिम बंगालच्या अध्यक्षा चंद्रिमा भट्टाचार्य यांचा राजीनामा; ममता बॅनर्जींचे विधानकोलकाता21 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातृणमूल काँग्रेस (TMC) च्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी...

शुक्राचे राशी परिवर्तन आज:शुक्रासाठी शिवपूजा आणि दुधाचे दान करा, जाणून घ्या 1 ऑगस्टपर्यंतचा काळ...

0
आज (4 जुलै) दुपारी सुमारे 4 वाजता शुक्र राशी बदलून सिंह राशीत येईल. त्यानंतर हा ग्रह 1 ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. शुक्र वृषभ...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...
spot_img

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण...

0
व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे...
error: Content is protected !!