Homeदेश-विदेशकाळी साडी, चेहऱ्यावर बुरखा अन् मित्रासोबत...; अर्चना तिवारीच्या नवीन Video ने धक्कादायक...

काळी साडी, चेहऱ्यावर बुरखा अन् मित्रासोबत…; अर्चना तिवारीच्या नवीन Video ने धक्कादायक खुलासा…


कटनीची रहिवाशी आणि इंदूरमध्ये न्यायाधीश बनण्याच्या तयारीत करत असणारी 29 वर्षीय अर्चना तिवारी हिच्या बेपत्ता होण्याचे आणि नंतर अचानक सापडण्याचे गूढ पोलिसांना उलगड्यात यश आले आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या धागादारातून हे अपहरण किंवा अपघात नसून अर्चनाने रचलेला सर्व कट होता. आता या प्रकरणाचा एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण सत्य उघडकीस आले आहे. (Archana Tiwari Video Black saree holding her friend hand at railway station Missing Update crime story in marathi)

या व्हिडीओमध्ये, अर्चना इटारसी रेल्वे स्थानकातून काळ्या साडीने बाहेर पडताना, तिचा चेहरा बुरख्याने झाकलेला आणि तिच्या मित्र तेजेंद्रचा हात धरलेला दिसत आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, संपूर्ण कट किती विचारपूर्वक आखला गेला होता. 7 ऑगस्टच्या रात्री अर्चना नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून निघाली. तिने तिच्या कुटुंबाला राखीनिमित्त कटनीला जाणार असल्याचे सांगितले होतं. पण ती तिथे पोहोचलीच नाही. दुसऱ्या दिवशी तिचा फोन बंद होता आणि कुटुंबाने भोपाळमधील राणी कमलापती जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, इटारसी स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्चना तिवारी तिच्या मित्र तेजेंद्रसोबत दिसत आहे. फुटेजमध्ये अर्चना काळी साडी नेसलेली आहे आणि तिचा चेहरा कापडाने झाकलेला आहे. तेजेंद्र तिला वेगाने प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढताना दिसत आहे.

पोलीस तपासात असे दिसून आले की, अर्चनाने आधीच बेपत्ता होण्याचा कट रचला होता. वकील असल्याने तिला कायदा आणि तपास प्रक्रियेतील गुंतागुंत माहित होती. तिला वाटले की, जर जीआरपीमध्ये गुन्हा दाखल झाला तर त्याची सखोल चौकशी होणार नाही. हा विचार मनात ठेवून अर्चनाने तिचा मोबाईल फोन इटारसीजवळील जंगलात फेकून दिला, जेणेकरून ठिकाण शोधता येणार नाही. इतकेच नाही तर ट्रेनमधून उतरल्यानंतर तिने असा मार्ग निवडला जिथे टोल टॅक्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची शक्यता नव्हती.

मित्रांच्या मदतीने रचला कट

पोलीस अधीक्षक (रेल्वे) राहुल कुमार लोढा म्हणाले की, या संपूर्ण घटनेत अर्चनाचे दोन मित्र, शुजलपूर येथील रहिवासी, सरांश आणि नर्मदापुरम येथील ड्रायव्हर तेजेंद्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्चनाची भेट इंदोरमध्ये शिक्षणादरम्यान सरांशशी झाली. तेजेंद्र हा एक ड्रायव्हर होता जो अनेकदा अर्चनाला बाहेर घेऊन जात असे. यावेळी तो नर्मदापुरमहून ट्रेनमध्ये चढला. तिघांनी मिळून ठरवले की हरवल्याचे नाटक करणे सोपे होईल.

इंदूर ते दिल्ली, नंतर नेपाळ असा प्रवास…

तेजेंद्र आणि सरांशच्या मदतीने अर्चनाने इटारसी सोडले आणि शुजलपूरला पोहोचली. तिथून तिने लांबचा मार्ग निवडला जेणेकरून ती कोणत्याही टोल प्लाझा किंवा कॅमेऱ्यात अडकू नये. शुजलपूरहून ती बुरहानपूरला गेली. तिथून ती हैदराबाद आणि नंतर जोधपूरमार्गे दिल्लीला पोहोचली. त्यानंतर, ती 14 ऑगस्ट रोजी सरांशसोबत नेपाळला गेली. या काळात अर्चनाला मध्य प्रदेशातून नवीन सिम कार्ड किंवा फोनही मिळाला नाही, त्यामुळे तिचा कुठेही माग काढता आला नाही.

500 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन केले, नंतर…

अर्चनाच्या शोधात, जीआरपीच्या 70 सदस्यांच्या पथकाने सुमारे 12 – 13 दिवस रात्रंदिवस काम केले. पथकाने 500 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. अर्चनाच्या कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये (सीडीआर) एका नंबरवर दीर्घ संभाषण रेकॉर्ड केले तेव्हा तपासात एक मोठा सुगावा लागला. तो नंबर सरांशचा असल्याचे निष्पन्न झाले. तिथून पोलिसांनी धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली. सरांशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण रहस्य उघडकीस आले.

अखेर नेपाळ सीमेवर…

पोलिसांनी सरांशला पकडताच, ही बातमी अर्चनापर्यंतही पोहोचली. तोपर्यंत ती नेपाळमध्ये होती, पण कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर ती नेपाळ-भारत सीमेवरून परत आली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी शहरातून तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला भोपाळला आणून चौकशी करण्यात आली. लग्न टाळण्यासाठी तिने ही कहाणी रचली होती. पोलीस तपासात असे दिसून आले की, अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागील खरे कारण तिचे लग्न होते. तिच्या कुटुंबाने तिचे लग्न एका पटवारीशी ठरवले होते आणि तिच्यावर अभ्यास सोडून लग्नाची तयारी करण्यासाठी दबाव होता. पण अर्चना यासाठी तयार नव्हती. म्हणूनच तिने लग्न पुढे ढकलण्यासाठी बेपत्ता होण्याचे नाटक केले.

या संपूर्ण प्रकरणाबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते. परंतु चौकशीदरम्यान अर्चनाने स्पष्टपणे सांगितले की तिचे सारांशशी कोणतेही प्रेमसंबंध नाहीत. तो फक्त तिचा मित्र आहे, ज्याने या संपूर्ण योजनेत मदत केली. तपासादरम्यान कॉन्स्टेबल राम तोमरचे नावही चर्चेत आले. परंतु पोलिसांनी स्पष्ट केले की अर्चनाच्या बेपत्ता होण्यात राम तोमरची कोणतीही भूमिका नाही.

FAQ

1. अर्चना तिवारी कोण आहे आणि ती बेपत्ता कशी झाली?

अर्चना तिवारी ही 29 वर्षांची कटनी येथील रहिवासी आणि इंदूरमध्ये न्यायाधीश बनण्याच्या तयारीत असलेली वकील आहे. ती 7 ऑगस्ट 2025 रोजी नर्मदा एक्सप्रेसने इंदूरहून कटनीला जाण्यासाठी निघाली होती, पण ती तिथे पोहोचली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा फोन बंद झाला, ज्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली.

2. अर्चना बेपत्ता होण्यामागील खरे कारण काय होते?

अर्चनाने स्वतः बेपत्ता होण्याचा कट रचला होता. तिच्या कुटुंबाने तिचे लग्न एका पटवारीशी ठरवले होते आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव होता. लग्न टाळण्यासाठी तिने हे नाटक केले.

3. इटारसी रेल्वे स्टेशनवरील व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हिडिओमध्ये अर्चना काळ्या साडीत आणि चेहरा बुरख्याने झाकलेला असा दिसत आहे. ती तिच्या मित्र तेजेंद्रचा हात धरून प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडताना दिसते, जे दर्शवते की हा कट विचारपूर्वक आखला गेला होता.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या...

0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या...

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!