HomeमनोरंजनNashik boy dies during Loud Music Can DJ noise really cause death...

Nashik boy dies during Loud Music Can DJ noise really cause death What Expert Says; डीजेच्या दणदणाटामुळे खरंच मृत्यू होऊ शकतो? डॉक्टर म्हणतात….


नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने रविवारी रात्री एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फुलेनगरमध्ये घडल्याची नोंद पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे. नितीन फकिरा रणदिवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डीजे सुरू झाल्यानंतर जवळच उभ्या नितीनची प्रकृती बिघडली व त्याच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याचे पोस्टमार्टम सुरू आहे. गेल्या चार वर्षापासून क्षयरोगाचा उपचार होते. तसेच या तरुणाचा डीजेच्या झटक्यानं मृत्यू झाला का? तसेच लग्न, पार्टी किंवा उत्सवात अशा पद्धतीने उभे राहणे योग्य आहे का? यावर कार्डिओलॉजिस्ट काय सांगतात पाहा.

खरंच डीजेच्या आवाजामुळे मृत्यू होतो का?

डीजेचा आवाज ९० ते १०० डेसिबल असतो. १०० ते १२० डेसिबलदरम्यानच्या आवाजामुळे कानाचा पडदा फाटू शकतो, चक्कर येऊ शकते. या आवाजामुळे हृदयाचे ठोके बंद पडून ‘हार्ट अॅटॅक’ येऊ शकतो. १८० डेसिबल आवाजामुळे मृत्यूही ओढवला जाऊ शकतो. हा आवाज जितका जास्त काळ पडेल तितका धोका वाढत जातो, अशी माहिती डॉ. केशव काळे, वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांनी दिली आहे.

डॉक्टर सांगतात की, ध्वनी प्रदूषणामुळे आर्टियल हायपरटेंशन म्हणजेच हृदयावर ताण येणं, मायोकार्डियल इंफ्रॅक्शन म्हणजे हार्ट अॅटॅक येणं किंवा स्ट्रोक सारखे त्रास होऊ शकतात. जेव्हा डीजे किंवा इतर कोणत्याही मोठ्या साउंड सिस्टममधून मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जातं. तेव्हा मानवी शरीरात असामान्य शारीरिक प्रतिक्रिया घडू शकते. ठरावीक पातळीपेक्षा अधिक डेसिबलचा आवाज मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. याचा हृदय आणि मेंदूसारख्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करू शकतो. हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जसे की डीजे, साउंड सिस्टीम्स, प्रचंड गर्दीचे कार्यक्रम यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. डीजेच्या कंपनांचा ताण केवळ कानांवरच नाही, तर संपूर्ण शरीरावर होतो. काहीवेळा  हे अनेकांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे विशेषतः आजारी व्यक्तींनी मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

काणठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढतात, हृदयाची गती वाढते. परिणामी त्याने रक्तदाब वाढतो आणि श्वासोच्छवासात अडथळा येतो. परिणामी रक्तवाहिनी फाटते, रक्ताची गुठळी निर्माण होऊन मृत्यू देखील ओढावू शकतो. एअर प्लग अथवा एअर मास्क वापरल्यास आवाजाची क्षमता कमी होते. अशावेळी आवाजाच्या क्षेत्रात कानात कापूस घालावा़ किंवा पोहण्यासाठी वापरण्यात येणारे एअर प्लगचा वापर हा या आवाजावर सर्वात चांगला उपाय आहे. स्पिकरच्या आवाजाच्या क्षेत्रात खूप वेळ थांबू नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयविकाराचे रुग्ण, यांनी अशा ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!