मनोरंजन : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांच्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला माहित आहेत. राज कपूर यांची तीन मुलं रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर. पण त्यापैकी राज कपूर यांच्या दोन मुलांना अर्थात रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांना सगळे ओळखतात. कारण हे दोघं सतत लाइमलाईटमध्ये राहायचे आणि राजीव कपूर हे लाइनलाइटपासून लांब राहायचे. त्याचं कारण म्हणजे त्यांचं अपयशी ठरलेलं फिल्मी करिअर होतं. करिअरसोबत राजीव कपूर यांच्या खासगी आयुष्यात त्यांनी खूप चढ-उतार पाहिले. 2001 मध्ये लग्न करणारा राजीव कपूर यांचा 2 वर्षात घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी कधी लग्न कधी केलं नाही. तर त्यांची पत्नी आरती सभरवालविषयी जाणून घेऊया…
राज कपूर यांनी त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा राजीव कपूरला चित्रपट तेरी गंगा मैलीमधून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. राजीव कपूर यांचा हा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि लोकांनी त्यांना अभिनेता म्हणून स्वीकारलं. पण त्यानंतर राजीव कपूर इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ राहिले नाही. राजीव कपूरचं करिअर हे सुपरफ्लॉप झाल्यानंतर त्यांची इच्छा होती की त्यांच्या वडिलांनी असाच एखादा सुपरहिट चित्रपट बनवावा. पण राज कपूर यांनी असं केलं नाही आणि यामुळे राजीव हे त्यांच्यावर खूप चिडले आणि त्यांच्यात भांडण झाल्याचं देखील म्हटलं जातं.
राजीव कपूर हे ज्या काळात करिअरमध्ये स्ट्रगल करत होते त्यावेळी त्यांना ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातील त्यांच्या सहकलाकारावर असलेल्या दिव्या राणा यांनी त्यांचं लक्ष वेधलं. दिव्या राणा आणि राजीव कपूर रिलेशनशिपमध्ये आले. ते एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होते. पण तरी सुद्धा राजीव यांचं हे नातं यशस्वी ठरलं नाही आणि दोघांना वेगळं व्हावं लागलं. त्यानंतर राजीव यांना आरती 2001 यांच्याशी लग्न केलं पण ते त्यांचं नातं जास्त काळं टिकलं नाही. राजीव आणि आरती यांच्यात काहीच काळात भांडणं सुरु झालं.
राजीव कपूर हे कपूर कुटुंबातील एक अशी व्यक्ती आहे जी लाइमलाइटपासून लांब राहिले. वडिलांसोबत त्यांचं नातं खराब झालं, त्यात आशा होती की त्यांचं खासगी आयुष्य चांगलं राहिलं. राजीव यांना वैवाहीक आयुष्याचं सुख देखील मिळालं नाही. आरती यांच्यासोबत होत असलेली भांडण पाहता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 2 वर्षानंतर राजीव आणि आरती विभक्त झाले.
राजीव यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आरती सभरवाल यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वत: चा व्यवसाय सुरु केला. एक-दोन बिझनेस काही चांगले चालले नाही. त्यानंतर त्यांनी लोणचं बनवणारी कंपनी सुरु केली आणि आज आरती या यशस्वी बिझनेसवुमन आहेत. सौ.झी.न्यूज































