काश्मीरमधील हिंदुवरील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने महिलांनी निषेध मोर्चा काढून पोलिस प्रशासनाला निवेदन दिले.
?
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील बैसरण घासवाटा परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर त्याचा धर्म विचारून निर्दयपणे हत्या केली. या २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. ही घटना दहशतवाद्यांनी केलेली क्रूर घटना म्हणावी लागेल. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदू समाजावर झालेले थेट आक्रमण आहे. आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. काश्मीरमध्ये झालेल्या हिंदू धर्माच्या पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारे निवडून थेट गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ही घटना केवळ हिंसाचार नसून ती हिंदू विरोधी आणि भारताच्या अखंडतेविरोधात उभ्या राहिलेल्या कटाचा भाग आहे. गेल्या काही काळात हिंदू व्यावसायिक ठेचून मारले. हिंदू जनजागृती समितीच्या ४० ते ५० महिलांनी सोनई शहरात निषेध मोर्चा काढून सोनई पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. पोलिस प्रशासनाच्या वतीने बाळासाहेब भास्कर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पाकिस्तानचा निषेध केला.





























